अनेक गायकांनी त्यांच्या आवाजाने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु आवाज आणि सौंदर्याने कोणी चाहत्यांना घायाळ केले असेल ती म्हणजे कनिका कपूर. (Kanika kapoor) तिच्या अनेक गाण्यांनी तिने प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहेत. अशातच रविवारी (21 ऑगस्ट) रोजी कनिका तिचा 45वा वाढदिवस आहे. कनिकाची गाणी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही लोकप्रिय आहेत. आज कनिका कपूरची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि लाखो लोक तिच्या गाण्यांचे वेड आहेत. कनिका बॉलीवूडमध्ये गायिका म्हणून गाणी गाते, याशिवाय ती अनेकवेळा रिअॅलिटी शोज गातानाही दिसली आहे. आज कनिका बॉलीवूडमधील सर्वात हिट गायकांपैकी एक आहे, पण एक काळ असा होता जेव्हा ती आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होती, परंतु तिने तिच्या क्षमतेच्या बळावर वेगळे स्थान मिळवले. चला तर मग जाणून घेऊया कनिका कपूरच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.
21 ऑगस्ट 1978रोजी जन्मलेल्या कनिका कपूरचे आयुष्य संघर्षांनी भरलेले असले तरी मेहनतीच्या जोरावर तिने वेगळे स्थान मिळवले आहे. कनिका कपूरने वयाच्या 8व्या वर्षी पंडित गणेश प्रसाद मिश्रा यांच्याकडून संगीत शिकण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 12व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली. त्यादरम्यान कनिकाने ऑल इंडिया रेडिओच्या एका कार्यक्रमात परफॉर्म केले. त्यानंतर कनिकाने आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही.
View this post on Instagram
कनिका कपूरने अनुप जलोटासोबत भजनेही गायली आहेत आणि याशिवाय तिने बॉलिवूडला अनेक सुपर डुपर हिट गाणीही दिली आहेत. कनिकाने 2012 मध्ये तिचा पहिला म्युझिक व्हिडिओ रिलीज केला होता. याशिवाय रागिनी एमएमएसमधील ‘बेबी डॉल मैं सोने दी’ या गाण्याने कनिका कपूर सर्वाधिक चर्चेत आली होती. या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय चिट्टियाँ कलाईयान हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय गाणे आहे.
View this post on Instagram
आज कनिका कपूरचे देश-विदेशात खूप मोठे चाहते आहेत आणि ती इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या गायकांपैकी एक आहे. मात्र, एक वेळ अशी आली की त्यांच्याकडे मुलांची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. खरं तर, कनिका जेव्हा केवळ 18 वर्षांची होती, तेव्हा 1997 मध्ये लंडनमधील एका एनआरआय व्यावसायिकासोबत तिचे लग्न झाले होते. पुढे कनिका आणि राज यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी ती तीन मुलांची आई होती. त्यादरम्यान कनिकाला खूप संघर्ष करावा लागला होता.
हेही वाचा-
–संगीतविश्व समृद्ध करणारे संगीतकार अजय- अतुल, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास
–अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देत सना खानने गुपचूप केले लग्न; तर अपहरण केल्याचाही लावण्यात आला होता अभिनेत्रीवर आरोप