Wednesday, July 3, 2024

‘इंडियन आयडल १२’ शोवर भडकले प्रेक्षक; ‘या’ स्पर्धकाला बाहेर काढण्याची केली मागणी

टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘इंडियन आयडल १२’ मागील काही दिवसांपासून लोकांच्या निशाण्यावर आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून दिग्गज गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांच्या एपिसोडनंतर या शोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अमित कुमार यांनी शोमध्ये पाहुणे म्हणून गेले होते आणि शोनंतर त्यांनी निर्मात्यांबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. शोच्या निर्मात्यांकडून त्यांना सांगण्यात आले होते की, कोणी कसाही परफॉर्मन्स केला, तरीही तुम्हाला त्यांची प्रशंसा करावी लागेल, असे ते म्हणाले होते.

अमित यांच्या या वक्तव्यानंतर शोचा होस्ट आदित्य नारायणने अमित यांची थट्टा उडवत नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आलेल्या पाहुण्यांना प्रश्न विचारला होता. यावेळी तो म्हणाला होता की, “तुम्ही खरंच सर्वांची प्रशंसा करत होता की, आमच्या टीमने तुम्हाला असे सांगितले होते?” या पाहुण्यांमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड यांचा समावेश होता.

‘शनमुखप्रियाने एलिमिनेट झाले पाहिजे’
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आदित्य नारायण आणि शोची स्पर्धक शनमुखप्रियाला ट्रोल केले जात आहे. प्रेक्षक शनमुखप्रियाच्या गाण्याच्या स्टाईलवरून नाराज आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, ती गाण्यांना आपल्या स्टाईलमध्ये गाऊन खराब करत आहे. सोशल मीडियावर युजर्सनी मागणी केली आहे की, ‘शनमुखप्रियाने एलिमिनेट झाले पाहिजे.’

खरं तर नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शनमुखप्रियाने आशिष कुलकर्णीसोबत ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ हे गाणे गायले होते. तिच्या या गाण्यावरील परफॉर्मन्समुळे युजर्स खूपच नाराज आहेत. दुसरीकडे काही युजर्स म्हणत आहेत की, “ती मूळ गाण्याला खराब करते.” इतर युजर्स म्हणत आहेत की, “ती गाण्याची मूळ ट्यून बदलते, जे खूपच खराब वाटते.”

काय आहे किशोर कुमार यांच्या मुलाचे प्रकरण?
खरं तर शोच्या एका एपिसोडमार्फत किशोर कुमार यांना ट्रिब्यूट दिला गेला. या खास एपिसोडसाठी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना पाहुणे म्हणून बोलावले गेले होते. तरीही प्रेक्षकांना हा एपिसोड खूप आवडला नाही. त्यामुळे या एपिसोडवर खूपच टीका करण्यात आली. त्यावेळी याप्रकरणात अमित यांच्याशी चर्चा करण्यात आली, तेव्हा त्यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, “निर्मात्यांनी मला सांगितले होते की, कोणी कसेही गायले, तरीही मला त्यांची प्रशंसा करायची आहे.”

का गेले होते शोमध्ये?
जेव्हा अमित यांना विचारले गेले की, शोमध्ये का गेले होते? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “सर्वांनाच पैशांची आवश्यकता असते, मलाही होती. मी जितके पैसे मागितले, त्यांनी मला दिले आणि मी शोमध्ये गेलो.” इतकेच नव्हे, तर त्यांनी हेही सांगितले की, त्यांनी स्वत: या एपिसोडचा आनंद लुटला नव्हता.

अमित कुमार यांच्या या वक्तव्याने ‘इंडियन आयडल’शोवर खूपच टीका केली जात आहे. यामुळे निर्मातेही चिंतेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपूर बहिणींनी शेअर केला आजी- आजोबांचा फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’

-‘भाभी जी घर पर है’मधील नवीन ‘गोरी मेम’ सोडतेय मालिका? नेहा पेंडसेने सांगितले सत्य

-गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम

हे देखील वाचा