Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘प्रेक्षकांना काय पाहिजे हे मला चांगल कळत’, अभिनेत्री कंगना रणौतने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबद्दल केला मोठा खुलासा

‘प्रेक्षकांना काय पाहिजे हे मला चांगल कळत’, अभिनेत्री कंगना रणौतने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबद्दल केला मोठा खुलासा

कंगना रणौत (Kangana Ranaut) ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या कंगना तिच्या इमर्जन्सी या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांंधींची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनेत्री कंगनाने आधीच खुलासा केला आहे. काय म्हणाली ती नेमकं चला जाणून घेऊ. 

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा विवादास्पद वक्तव्यांमुळेच नेहमी चर्चेत येत असतात. यामध्ये कंगना रणौतचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने कंगना माध्यमांमध्ये चर्चेत येत असते. अनेक विषयांवर ती आपले मत जाहीरपणे मांडत असते. ज्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सध्या अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी इमर्जन्सी या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामधील तिच्या लूकचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्याआधी कंगणाने तिच्या चित्रपटांबद्दल खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना कंगना म्हणाली की, “माझ्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या शेवटच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून मी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार करत होते, पण माझ्याकडे अनेक अभिनय असाइनमेंट बाकी होत्या. मला वाटते की मला प्रेक्षकांची नाडी चांंगली ओळखता येते.  माझ्या मुलाखती आणि मी वापरत असलेल्या संज्ञा आज पॉप संस्कृतीचा भाग आहेत. मला वाटते की प्रेक्षकांना काहीतरी हवे आहे जे त्यांना मानसिकदृष्ट्या जागरूक करू शकेल.”

कंगना पुढे म्हणाली, “अलिकडील आणीबाणी हा इतिहासाचा असाच एक भाग आहे जो निर्विवाद आहे आणि मला वाटते की प्रेक्षकांना तो आवडेल. जेव्हापासून त्याचा टीझर लाँच झाला आहे, तेव्हापासून तो नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. प्रेक्षकांना काय हवे आहे हे ते दर्शवते.  लोकांना कंटेंट बघायचा नाही, त्यांना टिपिकल फॉर्म्युला चित्रपटांऐवजी तरुण चित्रपट निर्माते, नवीन कल्पना आणि ताजेतवाने कल्पना पहायच्या आहेत. मला खात्री आहे की एक चित्रपट निर्माता म्हणून मला या दृष्टिकोनाचा आणि विचाराचा फायदा होईल.” दरम्यान कंगनाचा हा चित्रपट किती प्रभावी ठरणार आहे प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

हे देखील वाचा