हिंदी सिनेसृष्टीमधे आपल्या अभिनयाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्धीकीने मोठ्या प्रमाणावर नावलौकिक मिळवले. अतिशय मेहनतीने त्याने हे यश, नाव आणि पैसा कमवला. असे असले तरी मागील काही काळापासून तो सतत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. त्याची पत्नी आलिया आणि भाऊ शमास त्याच्यावर रोज नवनवीन आरोप लावताना दिसत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हे नवाजवर अनेक आरोप लावत विविध व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत आहे. मात्र याबाबत नवाजने काहीही मतं मांडली नाही. आता पहिल्यांदाच नवाजने त्याचे मौन सोडत या सर्व प्रकरणांवर भाष्य केले आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्याची बाजू मांडली आहे. त्याची बाजू ऐकल्यानंतर आता अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला असून, यात अभिनेत्री कंगना रणौतचा देखील समावेश आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीने ट्विटरवर सर्व आरोपांचे खंडन करत जी पोस्ट लिहिली आहे त्यात तो म्हणतो, “हा आरोप नाही तर मी माझी बाजू मांडत आहे. आतापर्यंत शांत राहीलो म्हणून मी वाईट माणूस आहे अशी माझ्यावर टीका करण्यात आली. हा तमाशा माझ्या मुलांना कधीतरी कळणारच या कारणामुळे मी शांत होतो. सोशल मीडिया, मीडिया आणि काही लोकं माझ्या या खराब प्रतिमेचा मनसोक्त आनंद घेत आहेत”.
This is not an allegation but expressing my emotions. pic.twitter.com/6ZdQXMLibv
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) March 6, 2023
पुढे नवाजने लिहिले, “मी सगळ्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. गेल्या काही वर्षांपासून मी आणि माझी पत्नी आलिया एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. मात्र आम्ही आमच्या मुलांसाठी समजुतदारी दाखवत वागत होतो. माझी मुलं सध्या भारतात का आहेत? मागील ४५ दिवसांपासून ते शाळेत का गेली नाहीत? या प्रश्नांची उत्तर मला कोणी देईल का? मला माझ्या मुलांच्या शाळेमधून सतत पत्र येत आहे. माझी मुलं शाळेत का येत नाहीत? असे सतत विचारले जात आहे.”
पुढे नवाज म्हणतो की, तो प्रत्येक महिन्याला त्याची पत्नी असलेला आलियाला १० लाख रुपये देतो. मात्र आलिया ते पैसे स्वतःसाठी खर्च करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. नवाजुद्दीनची पत्नी त्याच्या दोन्ही मुलांसह दुबईमध्ये राहते. मात्र पत्नीसह दोन्ही मुलांचा खर्च नवाजुद्दीन करत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने त्याची प्रतिमा खराब करण्याचे आलियाचे प्रयत्न असल्याचा आरोप तिच्यावर केला आहे.
नवाजुद्दीने त्याच्या मांडलेल्या बाजू नंतर कंगनाने त्याचे समर्थन करताना तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिले, “नवाजुद्दीन सर हे खूप आवश्यक होते. शांत बसने नेहमीच आपल्याला शांतता देत नाही. मला आनंद आहे की, तुम्ही तुमची बाजू मांडली. तुमचे अनेक फॅन्स आणि शुभ चिंतक होते, ज्यांना यात तुमची बाजू ऐकायची होती.” नवाज आणि कंगना या दोघांच्याही पोस्टवर आता त्यांचे फॅन्स कमेंट्स करत असून, काहींनी नावाजला पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्याला खोटा म्हटले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’
आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच