Sunday, June 1, 2025
Home बॉलीवूड इंटनॅशनल मीडियावर भडकली कंगना रणौत, व्हिडिओ शेअर करून संताप केला व्यक्त

इंटनॅशनल मीडियावर भडकली कंगना रणौत, व्हिडिओ शेअर करून संताप केला व्यक्त

बॉलिवूडमधील धाकड गर्ल कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच सर्वत्र चर्चेत असते. आपल्या स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे तिला सर्वत्र ट्रोल केले जाते. प्रत्येक वेळी कंगनाने बॉलिवूडपासून ते अगदी भारताच्या राजकारणात अनेक वेगवेगळे प्रश्न उठवले आहेत.प्रत्येक प्रश्नात प्रत्येक अडचणीमध्ये तिने तिचे विचार देखील मांडले आहेत.

भारतामध्ये वाढत चाललेल्या कोरोना महामारीमुळे सगळेच त्रस्त झाले आहेत. या संकटाच्या प्रसंगात आंतरराष्ट्रीया मीडिया भारताबद्दल जे काही लिहित आहेत, कंगनाने त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. शुक्रवारी (३० एप्रिल) दुपारी तिने तिच्या घरातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच रागावलेली दिसत आहे. भारताबद्दल असं कोणी बोलत असेल, तर त्यांच्याविरुद्ध ऍक्शन घ्या, असे सुचवले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1388027680675688454

या व्हिडिओमध्ये तिने तिचा सगळा राग बाहेर काढला आहे. तसेच हा अतिशय गंभीर मुद्दा आहे असे ती म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “भारतावर असं संकट आलं की, बाकीचे देश भारताला टार्गेट करतात.” ती पुढे म्हणते की, “भारताला बाकीचे देश असं दाखवत आहेत, जसं काय आताच त्यांचं माकडातून माणसामध्ये रूपांतर झाले आहे. चार गोऱ्या माणसांशिवाय जोपर्यंत ते तुम्हाला येऊन गुलाम नाही ना बनवणार तो पर्यंत तुम्हाला समजणार नाही की, कसं बसायचं असतं आणि कसं खायचं असत.”

यांनतर कंगना म्हणते की, “तुम्हाला तर माहित देखील नाही लोकशाही नक्की काय असते. तुम्हाला नक्की कोणाला निवडायचे आहे. तुम्हाला तेवढी अक्कल पण नाहीये.”

कंगनाने भारतीय लेखक चेतन भगतवर देखील राग काढला आहे. खरंतर चेतनने फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसी उत्कृष्ट आहेत असे म्हंटले होते. यावर कंगनाने त्याला प्रश्न विचारला होता की, तुम्ही नक्की कुठून बेस्ट आहात. सोबतच लिहिले होते की, “तुम्ही सगळे भारतावर राग काढणं बंद करा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

हे देखील वाचा