मराठी कलाविश्वातील तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit ) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तेजस्विनी( Tejaswini Pandit ) बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. समाजातील अनेक घडामोडींवर ती आपलं परखड मत व्यक्त करत असते. याआधी तिने टोल मुद्दा तसेच राज्यातील राजकारणावर (maharashtra politics) ट्वीटमधून नाराजी व्यक्त केली होती. आता राज्यातील गुन्हेगारीवर तेजस्विनीने संताप व्यक्त करत ट्विट केले आहे. तिचे ट्विट चांगलेच चर्चेत आलं आहे.
तेजस्विनीने सध्याच्या राज्यातील सुरु असलेल्या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्षे सतावत आहेतच…आता सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज….? असा सवाल उपस्थिता करत असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता.” अशी पोस्ट अभिनेत्रीने केली आहे. तिची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत असून नेटकरी तिच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच…
आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….?असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता 💔
— TEJASWWINI (@tejaswwini) February 25, 2024
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्रास गोळीबार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर गोळीबार आणि हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात तब्बल १८३७ कोटींचे ड्रग्जही जप्त करण्यात आले. यासर्वांवर तेजस्विनीने संताप व्यक्त केला आहे.
तेजस्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेत्रीने नुकतंच पुण्यात सलोन सुरू केलं आहे. ती शेवटची ‘एकदा येऊन तर बघा’ या विनोदी चित्रपटात झळकली होती. रानबाजार, समांतर, अनुराधा या वेब सीरिजमध्येही तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
हेही वाचा:
Zeenat Aman | ‘या’ कारणामुळे रात्ररात्र झीनत अमान यांना लागत नाही डोळा, मुलाखतीत स्वतः केला खुलासा
Anupam Kher | शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया; म्हणाले,….