Saturday, July 6, 2024

“ज्याला जायचे तो…” अभिनेता पारस कलनावतच्या अनुपमाबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर निधी शहाची प्रतिक्रिया

अनुपमा या सुपरहिट मालिकेचे असंख्य चाहते आहेत. या मालिकेने सुरु झाली त्या दिवसापासून ते आजतागायत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिकेने अनेक जुन्या चेहऱ्यांना नवीन ओळख दिली. या मालिकेमुळे अनेक कलाकार पुढे आले. असाच एक अभिनेता म्हणजे पारस कलनावत. पारसने या शोमध्ये अनुपमाच्या मुलाची समरची भूमिका साकारली होती. पुढे त्याने हा शो सोडला. त्याने शो सोडल्यानंतर अनेक गोष्टी अनेक कारणं समोर आली होती. सध्या पारस कुंडली भाग्य मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पारसने या शोमध्ये अनेक कलाकारांना संधी मिळाल्यास हा शो सोडायचा आहे, असे वक्तव्य केले होते. त्याच्या या विधानावर मालिकेत किंजल ही भूमिका साकारणाऱ्या निधी शाहने प्रतिक्रिया दिली आहे.

निधीला एका मुलाखतीमध्ये पारसच्या या विधानाबद्दल विचारले गेल्यावर तिने म्हटले, “ज्याला शो सोडायचा असेल तो शो सोडेलचा. त्याला कोणीही थांबवू शकत नाही, त्याच्या समोर कोणीही हाथ पाय जोडणार नाही.”

निधीने पुढे सांगितले की, “शो टीआरपीमध्ये नंबर वन आहे. या शोसोबत जो कोणी जोडलेला आहे. तो जे काही करत आहे, ते मानपासून करत आहे. ते सर्व लोकं त्यांचे काम एन्जॉय करत आहे. सर्व मस्त चालू आहे. शो मागील तीन वर्षांपासून सतत नंबर वन आहे. आजच्या घडीला असे मोजून ३/४ शो असतील जे चांगले चालू आहे.”

दरम्यान पारसने एका रात्रीत हा शो सोडला होता. त्याने हा शो सोडल्यानंतर मोठा वाद उभा राहिला. त्याने प्रोडक्शन हाऊसवर आणि प्रोडक्शन हाऊसने त्याच्यावर अनेक आरोप केले होते.

हे देखील वाचा