Friday, September 20, 2024
Home टॉलीवूड आजकालचे नायक जंगल तोडतात ! पवन कल्याण यांनी पुष्पा – २ वर साधला निशाणा ?

आजकालचे नायक जंगल तोडतात ! पवन कल्याण यांनी पुष्पा – २ वर साधला निशाणा ?

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि तेलुगु स्टार पवन कल्याण यांनी जंगल संवर्धनाच्या विषयावर एक मोठे विधा केले आहे. आजकालचे चित्रपट हे कोणत्याही सामाजिक जबाबदारी शिवाय बनवले जात आहेत याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या एक अपत्रकार परिषदेत बोलताना पावन कल्याण यांनी चित्रपटांत नायकाची बदलली गेलेली प्रतिमा आणि बदलते ट्रेंड्स याविषयी वादन केले आहे. पण यावरून नेटकर्यांनी वेगळाच अंदाज बांधला आहे. 

इंटरनेट वर असे कयास लावले जात आहेत कि पवन कल्याण यांनी त्यांचे पुतणे असलेल्या अल्लू अर्जुन यांच्या पुष्पा – 2 या चित्रपटावर निशाणा साधला आहे. आपल्या मुलाखतीत पवन कल्याण म्हणाले, कन्नड कांतीरवा डॉ. राजकुमार यांची गंधडा गुडी पाहिल्यानंतर माझ्यात जंगलांविषयी जागरूकता निर्माण झाली. हा चित्रपट एक वन अधिकारी जंगलाला तस्करीपासून कसे वाचवतो याबाबत आहे. मी नंतर माझ्या सहकार्यांशी याविषयी बोलत होतो. संस्कृती किती बदलली आहे !    

पवन कल्याण पुढे म्हणाले, ‘चाळीस वर्षांपूर्वी हिरो हा जंगलाचे रक्षण करणारा होता. आजचा हिरो जंगलांची नासधूस करतो. वस्तूंची तस्करी करतो. असे चित्रपट बनवताना निर्मात्यांनी विचार करायला हवा की, खरच आपण समाजात योग्य संदेश देतो आहे का ! इंटरनेट वर अशी चर्चा होतेय की पवन कल्याण यांनी हे विधान अल्लू अर्जुन च्या पुष्पा -२ या चित्रपटाच्या विरोधात केले आहे 

पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुन यांनी चंदन तस्कराची भूमिका निभावली आहे. काही वृत्तानुसार अल्लू आणि पवन यांच्यातील नाते थोडेसे तणावपूर्ण आहे. कारण नुकतेच आंध्रप्रदेशात झालेल्या निवडणुकांदरम्यान अल्लू अर्जुन हे पवन कल्याण यांच्या विरोधी पक्षाचे समर्थन करताना दिसत होते. दरम्यान पवन यांच्या पक्षाने, जन सेना पार्टीने हि निवडणूक जिंकली. अल्लू अर्जुन यांचा सुपर हिट पुष्पा -२ येत्या डिसेम्बर महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो.   

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

मी गेल्यावर कोण कोण यायचं याची लिस्ट देऊन जाईन उगाचच वाईट वाटल्याचा आव आणू नका ! पुष्कर जोगची धक्कादायक पोस्ट …

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा