दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ‘पावरस्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता पवन कल्याण आपल्या अभिनयाने आणि राजकीय दबदब्याने चांगलाच चर्चेत असतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याचे काळजात धडकी भरवणारे स्टंट चाहत्यांना फार आवडतात. पवन कल्याण हा मेगास्टार चिरंजीवी यांचा छोटा भाऊ आहे. त्याचा जन्म आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील बापतला येथे २ सप्टेंबर, १९७१ रोजी झाला. पवन गुरुवारी (२ सप्टेंबर) त्याच्या ५० व्या वयात पदार्पण करत आहे. तो त्याच्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यातील काही गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतो. वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
पवनचा भाऊ चिरंजीवीला, तर तुम्ही सर्वच ओळखता ८० ते ९०च्या दशकामध्ये ‘मेगास्टार’ चिरंजीवीने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केले आहे. आपल्या भावाप्रमाणेच पवनने देखील चित्रपटसृष्टी गाजवली आहे. (Pawan kalyan birthday special Power star of South cinema has been married thrice)
पवन कल्याणचे खरे नाव काय
पवनचे खरे नाव कोन्निडेला कल्याण बाबू हे आहे. तो लहानपणापासूनच आपल्या मोठ्या भावाचा आदर्श घेऊन वाढत होता. त्याने चित्रपटांमध्ये काम करायचे ठरवले, तेव्हा सुरुवातीला त्याने कराटेचे शिक्षण घेतले. त्याने कराटेमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ जिंकला आहे. त्यामुळे चित्रपटातील अनेक खतरनाक स्टंट तो स्वतःच लिहायचा. पवनचे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे चित्रपटातील काम पाहून त्याचे नाव पवन कल्याण ठेवण्यात आले होते.
१६ वर्षात झाले होते ३ विवाह
पवनचे व्यवाहिक आयुष्य सुरुवातीला फारसे चांगले नव्हते. त्याने १९९७ ते २०१३ (१६ वर्षे) दरम्यान ३ लग्न केली होती. त्याने साल १९९७ मध्ये नंदिनीशी विवाह केला. परंतु दोघांचे पटत नसल्याने त्यांनी अवघ्या २ वर्षांतच साल १९९९ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर पवनने रेनू देसाईसोबत लग्न केले. त्यांना दोन मुलं झाली. त्यांच्या मुलाचे नाव अकिरा आणि मुलीचे नाव आध्या आहे. परंतु पवनचे रेनूबरोबर देखील पटत नसल्याने त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने तिसरे लग्न बाला अन्ना लेजनेवा या परदेशी मुलीबरोबर केले. त्या दोघांना देखील एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलाचे नाव मार्क शंकर पवनोविच आहे.
राजकीय कारकीर्द
पवनच्या राजकीय आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याच्या मनामध्ये आधीपासूनच जनतेविषयी प्रेम होते. त्यामुळेच त्याने नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी साल २००८मध्ये राजकारणात उडी घेतली. सुरुवातीला त्याने त्याच्या भावाचा पक्ष ‘प्रजा राज्यम’मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्याने स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्याच्या पक्षाचे नाव ‘जन सेना’ असे होते. त्यानंतर त्याने ‘सत्तारूढ़ तेलुगु देसम’ या पक्षाबरोबर युती करून भाजपला पाठिंबा दिला. त्या दरम्यान त्याने भाजपचा भरपूर प्रचार केला होता. त्यानंतर आंध्रप्रदेशला विशेष राज्य दर्जा देण्याच्या मागणीवरून त्याने भाजपमधील पाठिंबा काढून घेतला. तो महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी कायम कार्यशील राहतो.
— Pawan Kalyan (@PawanKalyan) August 22, 2019
चित्रपट
अभिनेत्याची चित्रपटांतील सुरुवातीची कारकीर्द फारशी चांगली नव्हती. साल १९९८मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘थोली प्रेमा’मधून पवनच्या अभिनयाला चांगलाच वाव मिळाला. त्यांनतर त्याने ‘तांबडू’, ‘बद्री’,’कुशी’ सारखे अनेक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आईकडून हजार रुपये घेऊन शाहरुख गौरीच्या शोधात आला होता मुंबईत, आज वर्षाकाठी कमावतो ‘इतके’ कोटी
–चित्रपटांपेक्षा वक्तव्यांमुळेच प्रकाशझोतात राहिला फैजल खान, आमिर खान आणि करण जोहरवर केले ‘हे’ आरोप