मराठी टेलिव्हिजनविश्वातील अभिनेत्री राधिका देशपांडे ही मधल्या काही काळापासून चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. राधिका तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या खोचक सोशल मीडिया पोस्टमुळे अधिकच गाजत आहे. राधिका अभिनेत्री असण्यासोबतच ती इतरही अनेक विविध ऍक्टिव्हिटी करत असते. नुकतीच तिने लहान मुलांसाठी नाटकाची एक कार्यशाळा घेतली होती. यात त्यांनी बसवलेले नाटक त्यांना लोकांपुढे सादर करायचे होते, मात्र त्यांना शासनाचा एकही हॉल मिळत नव्हता. अशातच राधिकाने संतापात एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टनंतर काय झाले याबाबत तिने आता दुसरी एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
राधिका देशपांडेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ते “चार हात, दोन फोन, एक नाथ.”
“सियावर रामचंद्र की जय”
मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध.
मी मागच्या पोस्ट मध्ये म्हणाले होते, “मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.” तसेच घडले.
ताजे टवटवीत फोटो आहेत, आठवणींच्या पेटीत मऊ मखमली शालीत ठेवण्यासारखे. त्यात आहेत नेते, अभिनेते, मंत्री, महामंत्री , प्रचारक, स्वयंसेवक, महागुरू आणि डॉक्टर. फोटो वर्तमानातला आहे. पण ह्यात मला भविष्यातली बलशाली पिढी घडताना दिसते आहे. “देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है”, असं मला दिसतं आहे.
पार्श्वभूमी अशी की मी बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधत होते. सरकार वर नव्हे तर सरकारी कामगार वर्गाच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होते. कामात कामचोरी, हलगर्जीपणा, बेशिस्त वागणं आणि उद्धट बोलणं खपवून घेणं मला जमलं नाही, जमत नाही. माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्या कामात अडथळा आणला जातो आहे हे लक्षात येता मी आवाज उठवला. आणि सरकार कडून त्वरित कारवाई सुरू झाली. चार हात कामाला लागले, मला दोन फोन आले आणि सांगण्यात आलं की कसली ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. वरिष्ठांनी दखल घेतली आहे. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली. मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्या पर्यंत पोहोचली. यंत्रणा हलली. आम्हाला हॉल मिळाला, आम्ही नाटक सादर केलं. एक प्रभु श्रीराम आमच्या पाठीशी आहेत पण तुम्ही त्याचे दूत बनून आमचा मार्ग मोकळा करून दिलात. लहान मुलांसमोर एक उदाहरण ठरलात. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. “एक नाथ कसा असावा तर असा!” धन्यवाद.
अतिथी म्हणून आलेल्यांसाठी आमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची आरास आहे आणि आम्ही झालर बनून उभे आहोत आशेने पहात. धन्यवाद. २ माणसं वाईट भेटली पण ४ चांगली माणसं ही भेटली आम्हाला! विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे मंजुश्री ताई खर्डेकर, संदीप खर्डेकर, सचिन पाषाणकर, किरण साळी, राहुल सर. धन्यवाद.
“चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ची कहाणी “चार हात, दोन फोन, एक नाथ” पर्यंत सुफळ संपन्न. बोलो “सियावर रामचंद्र की जय”.” या पोस्टसोबत तिने एक फोटो देखील शेअर केला आहे.
या पोस्टमधून राधिकाने सर्वांचे आभार मानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील धन्यवाद म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे आणि तिच्या नाटकाचे कौतुक केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नागिनसारखं डाेलत उर्फीने केला डान्स; युजर्स म्हणाले, ‘आ गई जंगली कहीं की…’
तांत्रिक अडचणींमुळे ‘चाैक’ चित्रपटाच्या प्रदर्शनात माेठा बदल, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट