Wednesday, July 3, 2024

‘संडे का वार’ राकेशवर पडला भारी, संतापलेल्या बहीण शीतलने साधला करण जोहरवर निशाणा

‘बिग बॉस ओटीटी’ शोला आजवरचा सर्वात जास्त वादग्रस्त शो म्हटले जाते. दररोज या कार्यक्रमाला एक वेगळेच वळण मिळते. कार्यक्रमातील स्पर्धक आज काय नवीन आणि हटके करणार आणि विशेष म्हणजे आज कोणाकोणाची भांडणे होणार? याकडेच प्रेक्षकांचे जास्त लक्ष असते. अशात करण जोहर सूत्रसंचालित ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अनेकवेळा करणसोबत देखील स्पर्धाकांची बाचाबाची होती. ‘संडे का वार’मध्ये तो प्रत्येक स्पर्धाकावर शब्दांचे वार करत असतो. कुणाचे काय चुकले असेल, तर त्या वरून त्या स्पर्धकाची चांगलीच हजेरी घेतो. आता पर्यंत अनेक स्पर्धकांबरोबर त्याचे वाद झालेले आहेत.

गेल्या शनिवारी करणने राकेश बापटला चांगलेच फटकारले. यावर त्याच्या बहिणीला म्हणजेच शीतलला खूप राग आला. त्यामुळे तिने करणच्या या वागण्यावर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. राकेश हा एक काउन्सिलर आहे. त्यामुळे आपल्या भावाच्या बाजूने शीतल म्हणाली की, “त्याच्या शब्दांचे चुकीचे अर्थ लावून त्याच्या विरोधात वापरले गेले आहेत. माझा भाऊ लहान मुलांचे शिक्षण, कौटुंबिक हिंसाचाराचे शिकारी झालेल्या व्यक्तींचे काउंसिलिंग आणि समाजातील लैंगिक विचारांना बदलण्याचे काम करत आहे. मी माझ्या भावाला चांगलेच ओळखते. त्याच्या कामाचा आणि शब्दांचा अर्थ बदलून त्याच्यावर चुकीचा शिक्का लावला जात आहे.” (Rakesh bapat sister Shital slams Karan johar for calling her brother bad words)

काय बोलला होता राकेश?
पुरुषांपेक्षा स्त्रिया कमजोर असतात, असे विधान राकेशने केले होते. यावर करण त्याला म्हणाला होता की, “तू असे विधान कसे करू शकतो. महिला खूप कमजोर आहेत असा तुझ्या बोलण्याचा अर्थ होतो. तू असे बोलायला नको होते. सध्याच्या युगामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान आहेत. महिला कोणापेक्षा कमी नाहीत.” यावर राकेश उत्तर देत म्हणाला की, “मला माहित आहे महिला किती सशक्त आहेत. मी अशा घरात वाढलो आहे जिथे महिला आहेत.”

यावर शीतल पुढे म्हणाली की, “शारीरिक दृष्ट्या महिलांपेक्षा पुरुष ताकतवर आहेत ही गोष्ट खरी आहे. एका टास्क दरम्यान त्याने असे म्हटले होते. परंतु त्याच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ लावला गेला आहे. तसेच त्याचे हे विधान घरातील दोन सदस्यांविषयी होते.” करणने राकेशच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावल्याने त्याच्या बहिणीने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘बिग बॉस ओटीटी’चे पर्व आता लवकरच संपणार आहे. अभिनेत्री शमिता शेट्टी, नेहा भसीन, प्रतीक सेहजपाल, दिव्या अग्रवाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक अंतिम फेरीमध्ये दिसणार आहेत. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच रंजक होत चालला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न

हे देखील वाचा