Wednesday, July 3, 2024

रणबीर- श्रद्धाच्या चित्रपटाच्या सेटवर गदारोळ, कामगारांनी थांबवले काम; काय आहे नेमकं प्रकरण?

मंगळवारी (१५ मार्च) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान कामगारांनी गोंधळ घातला. पाच महिन्यांहून अधिक काळ पैसे शिल्लक असल्याचे कामगाराचे म्हणणे आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये कांदिवली चारकोप परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटासाठी दैनिक कामगारांनी सेट उभारला होता. या रोजंदारी कर्मचारांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे पाच महिन्याहून अधिक काळ थकबाकी आहे. सेटवर पोहचलेल्या कामगारांचा गोंधळ पाहून पोलिसांना बोलविण्यात आले. कामगारांना आरे पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर फेडेरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्पलाॅयजचे आधिकारीही तेथे पोहचले आणि कामगारांची बाजू समजून घेतल्यानंतर त्यांना परत पाठवले गेले.

या संदर्भात एफडब्ल्यू आयसीईचे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणले की, जिथे कामगारांचे पैसे शिल्लक आहेत,तिथे कामगार स्वत:च काम थांबवत आहेत. एफडब्ल्यू आयसीई यात मध्यस्थी करेल आणि कामगांराचे पैसे मिळवून देईल. लब फिल्मसने दीपंकर दास गुप्ता यांना या चित्रपटाचे सेट लावण्याचे कॅान्ट्रक दिले होते आणि त्यांना पूर्ण पैसेही दिले होते, असा आरोप आहे. दीपंकर दास गुप्ता यांनी हा प्रकल्प एका कंपनीला आउटसोर्स केला होता जिथून दोघांनी दीपंकर दास गुप्ता यांच्याशी करार केला होता. या कंपनीने नंतर दुसऱ्याला आउटसोर्स केले आणि कमागारांचे १ कोटी २२ लाख रुपये अडकले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

हे देखील वाचा