Saturday, April 20, 2024

यंदा कर्तव्य आहे! रणबीर कपूर अन् आलिया भट्टच्या लग्नाची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी अडकणार रेशीमगाठीत

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. आलिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. चित्रपटांसोबतच, आलिया आजकाल तिच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत आहे. रणबीर कपूरसोबतच्या तिच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. ते एकमेकांना जवळपास ५ वर्षांपासून डेट करत आहे. या जोडप्याच्या लग्नाच्या अनेक अफवा इंटरनेटवर बऱ्याच दिवसांपासून फिरत आहेत. मात्र, या जोडप्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचे दिसते. माध्यमांतील वृत्तानुसार, रणबीर आणि आलिया यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार होते. पण आता असे वृत्त समोर आले आहे की, दोघेही ऑक्टोबर २०२२ मध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहेत.

लग्न एप्रिलमध्ये होणार का?
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) कुटुंब गेल्यावर्षी दोघांचे लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. यानंतर असा दावा केला जात होता की, दोघेही याचवर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत. मात्र, दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने ही बातमी खोटी असल्याचे दिसून येत आहे.

ऑक्टोबरमध्ये होणार लग्न
माध्यमांतील वृत्तानुसार, दोन्ही कलाकारांच्या कुटुंबीयांनी मिळून निर्णय घेतला आहे की, आलिया आणि रणबीर कपूर या वर्षाच्या अखेरीस लग्न करतील. यासोबतच भट्ट आणि कपूर कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नासाठी ऑक्टोबर महिना निश्चित केला आहे.

आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर याची कथा प्रसिद्ध लेखक एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला असून, यामध्ये आलियाने गंगूबाई या वेश्येची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा कामाठीपुरा येथील गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. जी एकदा १००० रुपयांना विकली गेली होती. त्यानंतर ती वेशा बनली. मात्र, गंगूबाईंनी आपल्या लोकांसाठी खूप काही केले होते, याचा उल्लेख चित्रपटात आहे.

‘या’ चित्रपटात दिसणार आहेत आलिया-रणबीर
आलिया सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याचवेळी रणवीर त्याचा आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. या दोघांची जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. या चित्रपटाशिवाय आलिया एसएस राजामौलीच्या ‘आरआरआर’ आणि करण जोहरच्या ‘तख्त’, ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’ आणि ‘डार्लिंग्स’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा