Wednesday, July 3, 2024

‘मला खुप वैताग आलाय म्हणत’ या अभिनेत्रीने सोशल मीडियाला केले Good bye

सोशल मीडिया हे सर्वांचं करंट माध्यम बनले आहे. प्रत्येक क्षणांचे अपडेट्स हे सोशल मीडियावरुन मिळत असतात. विशेष म्हणजे जगभरातील सेलिब्रिटी थेट चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेक कलाकार वैयक्तिक जीवनासह अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे शेअर करतात. मात्र, एका अभिनेत्री अशी जी या सर्वांला आता कंटाळली आहे. तिने ते गुड बाय म्हटले आहे.

भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राणी चटर्जी (rani Chaterjee) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. राणीचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. अशातच तिनं मोठी घोषणा करुन चाहत्यांना धक्का दिला आहे. तिनं सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे. यामागचे कारणदेखील राणीने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर अखेरची पोस्ट करत राणीने कारण सांगितले आहे.

“तुम्हाला सगळ्यांना मला काही सांगायचं आहे. मी एक छोटा ब्रेक घेते. मला कंटाळा आलाय. मला एका गोष्टीची जाणीव झालीये की, सोशल मीडियावर सतत राहण्याची सवय मला बदलायची आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी पुन्हा परत येईन. पण, मी सगळ्यांना खूप मिस करेन. काही दिवसांसाठी मला या सगळ्यापासून लांब रहायचं आहे, ” अशा आशयाची पोस्ट राणीने शेअर केली आहे.

राणी भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २००४ मध्ये ‘ससुरा बडा पैसेवाला’ या चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेता रणबीर कपूरला मिळाला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चा अवॉर्ड, वाचा सविस्तर
‘मी गायक नसतो तर आयुष्यात काहीच होऊ शकलो नसतो…’ गुरु रंधावाने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा