Thursday, May 15, 2025
Home बॉलीवूड ‘रंजू की बेटियां’ मालिकेला नवीन वळण, प्रेक्षकांना ‘अशा’प्रकारे हसवणार गुड्डू मिश्रा

‘रंजू की बेटियां’ मालिकेला नवीन वळण, प्रेक्षकांना ‘अशा’प्रकारे हसवणार गुड्डू मिश्रा

दंगल टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रंजू की बेटियां’ लवकरच नवीन वळण घेणार आहे. करवाचौथ व्रताच्या १२ व्या दिवशी दिवाळी येते आणि त्यानंतर सहा दिवस छठपूजा होते. यावेळी मुंबईत बनलेल्या या मालिकेच्या सेटवर छठ पूजेची छटा दिसली आणि हे सर्व फिल्मसिटीत नसून यूपी बिहारमधील एका गावातील घाटावर घडत असल्याचं दिसले. या छठ पूजेच्या सिलसिलादरम्यान ‘रंजू की बेटियां’ या मालिकेच्या सेटवर जे घडले ते खूपच धक्कादायक होते. शोच्या या एपिसोडची खरी गंमत तो पाहिल्यानंतरच कळेल, पण शूटिंगदरम्यान या मालिकेच्या कलाकारांनी याविषयी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. सर्वात मनोरंजक म्हणजे गुड्डू मिश्रा यांचा छठ पूजेचा दंडवत नमन संकल्प आहे, ज्यामध्ये छठ पूजेसाठी दंडवत नमन करत पुढे जात पूजा करावी लागते.

‘रंजू की बेटियां’ या मालिकेत रंजूची भूमिका साकारणारी रीना कपूर म्हणते की, छठ पूजेचा हा सीन शूट करणे हा एक अलौकिक अनुभव आहे. कपडे, सिंदूर, महिला एकत्र छठ गीत गाणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. ‘रंजू की बेटियां’च्या या सीनमध्येही ड्रामा असणार आहे. प्रकरण असे आहे की, २० वर्षात पहिल्यांदाच गुड्डू मिश्राने रंजू मिश्रा यांना पत्नी म्हणून स्वीकारले आहे. रंजू हे स्वीकारण्यास असमर्थ आहेत. कारण २० वर्षात बरेच काही घडले आहे, तिचा कशावरही विश्वास नाही. गुड्डू पुन्हा ललिताकडे जाण्याची शक्यताही आहे.

कथेनुसार, रंजू स्वत:ला आयुष्यभर एकटे राहावे लागेल, यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. मात्र, इतक्या वर्षांनंतर तिला पहिल्यांदाच पत्नीचा दर्जा मिळतोय हेही बरं वाटतंय. रंजूच्या आतही एक भीती असते की, ते खरे आहे की, आणखी काही. दुसरीकडे, गुड्डू मिश्रा यांच्या मनातही पश्चातापाची भावना आहे की, २० वर्षांपासून त्यांनी पत्नीला ती जागा दिली नाही, ज्यासाठी ती पात्र होती. त्यामुळे या छठ पूजेत तो दंडवत घेत नमन करत घाटावर जाईन असे व्रत घेतो. आपल्या मुलाच्या सुनेचे वैवाहिक जीवन आता पुन्हा रुळावर येईल याचा अम्माजींना आनंद आहे, पण ललिताला हे पचवता येत नाही.

शूटिंगदरम्यान बुलबुलची भूमिका साकारणाऱ्या रूपल त्यागीच्या म्हणण्यानुसार, “हा सीन ‘रंजू की बेटियाँ’चा एक अतिशय हम सीन आहे. या मालिकेच्या प्रेक्षकांना आातापर्यंत कळून चुकले आहे की, मालिका कितीही आनंदी असली, तरी ललिता काही ना काही तरी करते. ज्यामुळे ‘रंजू की बेटियां’मध्ये नाटक निर्माण होते. छठपूजा हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. जो आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. त्याच्यामध्ये नाटक होऊ नये, असं कसं होऊ शकत, उच्चस्तरीय नाटक होणार आहे.”

या मालिकेच्या कथेत गुड्डू मिश्रा आणि त्याच्या मुलींचे नाते सुरळीत होणार असल्याची झलक शूटिंगदरम्यान होती. आपले वडील असे प्रायश्चित्त करून नमस्कार करत आहेत हे पाहून रंजूच्या मुलींना धक्का बसला. या सीनबद्दल बोलताना अभिनेता अयुब खान म्हणतो, “गुड्डू मिश्रा यांनी छठ पूजेच्या निमित्ताने छठ व्रत दंडवत प्रणाम पाळण्याचे ठरवले आहे, जेणेकरून त्यांचे आयुष्य चांगले होईल. ते खूप कठीण होईल. यामध्ये लोक घरापासून घाटापर्यंत दर्शनासाठी पोहोचतात.”

गुड्डू मिश्रा यांचा छठ पूजेचा दंडवत नमन संकल्प पाहून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण

-शाहिद कपूर आणि अमृता रावच्या सुपरहिट ‘इश्क विश्क’ चित्रपटाचा येणार सिक्वल

हे देखील वाचा