Wednesday, July 3, 2024

‘मला तिची आजही आठवण येते’, अनुष्कासोबतच्या ब्रेकअपवर रणवीरची प्रतिक्रिया

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या वैवाहिक आयुष्यात सध्या व्यस्त आहे. क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केल्यापासून तिने सिनेजगतातील वावरही कमी केला आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाची आणि त्यानंतर झालेल्या शाही विवाह सोहळ्याची देशभरात चांगलीच चर्चा रंगली होती. वर्षापूर्वी अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. मात्र विराट कोहलीसोबतच्या प्रेमप्रकरणापूर्वी अनुष्का आणि अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) अफेअरची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र त्यांचे हे प्रेमप्रकरण फार काळ टिकू शकले नाही. जाणून घेऊया त्यांच्या प्रेमप्रकरणाचा हा सगळा किस्सा.

हिंदी सिने जगतात अशा अनेक प्रेमकहाण्या आहेत ज्यांचा शेवट गोड झाला नसला तरी चर्चा मात्र जोरदार झाली होती. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगचे नाव घेतले जाते. दोघांनी पहिल्यांदा ‘बँड बाजा बारात’ चित्रपटात एकत्र काम केले होते. रणवीर सिंगचा हा पहिलाच डेब्यू चित्रपट होता तर अनुष्काचा हा दुसरा चित्रपट होता. चित्रपटातील दोघांच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि चित्रपट हिटही झाला. एकत्र काम करत असताना, त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री तसेच त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री खूप चांगली झाली आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातही दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. काही काळ दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले होते, पण नंतर 2011 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीरने सोनाक्षी सिन्हासोबत एक अभिनय केला, ज्यामुळे अनुष्का त्याच्यावर चिडली. दोघांनी सर्वांसमोर भांडण केले आणि संपूर्ण कार्यक्रमात एकमेकांशी बोलले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, दोघांचे नातेही यामुळेच बिघडले. एकीकडे अनुष्काला त्यावेळी मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळत होते तर दुसरीकडे रणवीर इंडस्ट्रीत स्थान निर्माण करत होता. या सर्व गोष्टींमुळे अखेर त्यांचे नाते तुटले.

एका मुलाखतीत रणवीर अनुष्कासोबतच्या ब्रेकअपवर म्हणाला होता की, “मला तिची खूप आठवण येते. ती प्रेमळ आहे आणि लोक तिच्याबद्दल गैरसमज करतात. ती एक अतिशय गोड आणि प्रामाणिक व्यक्ती आहे . जेव्हा मी तिच्या विरोधात नकारात्मक लेख वाचतो तेव्हा मला राग येतो, परंतु माझ्यावर लिहिलेल्या नकारात्मक लेखांचा मला इतका राग येत नाही.” रणवीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनुष्काने विराट कोहलीसोबत तर रणवीरने दीपिका पदुकोणसोबत लग्न केले. दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा