बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे आज (११ फेब्रुवारी) निधन झाले. रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. एका माहितीनुसार रवी टंडन हे मागील काही काळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांना फुफ्फुसाचा फायब्रोसिस नावाचा आजार झाला होता. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास व्हायचा. रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली. रवी टंडन यांचे शुक्रवारी (११ फेब्रुवारी) रोजी अंतिम संस्कार करण्यात आले. रवी टंडन यांना रवीना आणि राजीव टंडन ही दोन मुलं असे असूनही रवीनाने तिच्या वडिलांचे अंतिम संस्कार केले. यावेळी तिचा भाऊ राजीव टंडन देखील उपस्थित होता. आपल्या हिंदू धर्मामध्ये पुरुषच अंतिम संस्कारांचे विधी पूर्ण करतात. मात्र रवीनाने आपल्या परंपरेला तोडत स्वतः लाडक्या वडिलांना शेवटचा निरोप दिला.
Actor #RaveenaTandon performs the last rites at her father’s funeral. ???????? pic.twitter.com/46mqNQe6EV
— Filmfare (@filmfare) February 11, 2022
हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal
रवी टंडन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक होते. रवी यांनी सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक आर के नय्यर यांच्यासोबत सहायक म्हणून काम केले. पुढे त्यांनी संजीव कुमार यांना घेऊन ‘अनहोनी’ हा सिनेमा बनवला. या सिनेमातील संजीव कुमार यांच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. त्यानंतर त्यांनी ‘खेल खेल मैं’ हा सिनेमा ऋषी कपूर यांच्यासोबत बनवला. अमिताभ बच्चन यांना घेऊन रवी टंडन यांनी ‘मजबूर’ आणि ‘ख़ुद्दार’ हे सिनेमे बनवले होते. रवी टंडन आणि संजीव कुमार यांची मैत्री बॉलिवूडमध्ये खूपच प्रसिद्ध होती.
रवीना टंडनने वडिलांच्या निधनाची बातमी सांगताना तिचे तिच्या वडिलांसोबतचे चार फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये ‘तुम्ही नेहमी माझ्यासोबत असाल. मी नेहमी तुमच्यासारखीच राहीन. मी तुम्हाला कधीही जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा.’ रवीनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे वडिलांसोबतचे काही बालपणाचे फोटो देखील आहेत. रवी टंडन यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा-
- लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये ३५० कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…
- करण जोहरच्या ‘या’ कृतीमुळे संपूर्ण मंगेशकर कुटुंब झाले होते नाराज, स्टेटमेंट काढत विचारले होते अनेक प्रश्न
- ‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी