Monday, July 1, 2024

इरफान खान यांच्या आठवणीत भावुक झाली सबा कमर, त्यांच्यासोबत जास्त संपर्कात न राहिल्याने केले दुःख व्यक्त

इरफान खान हे प्रतिभावान इंटरनॅशनल अभिनेते होते. ते हिंदी चित्रपटात एक मॉर्डन सेन्सिबिलिटी घेऊन आलव होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री शोक सागरात होती. ते दोन वर्षांपासून कँसरशी झुंज देत होते. त्यांचे २९ एप्रिल २०२० रोजी ५३ व्या वर्षी निधन झाले. अशातच इरफान खान सोबत काम केलेल्या सबा कमरला दिवंगत अभिनेत्याची आठवण आली आहे. ती त्यांच्या जास्त संपर्कात नव्हती या गोष्टीचे तिला खूप वाईट वाटत आहे.

सबाने तिच्या एका मुलाखतीत इरफान खानसोबतचा अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, ते खूप चांगले व्यक्ती होते. तिने सांगितले की, ती इरफान खान यांच्याकडून खूप काही शिकली आहे. इरफान खानचे कौतुक करताना सबा म्हणाली की, “ते खूप चांगले अभिनेते होते. त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले.”

इरफान खानसोबत आपल्या कामाचा अनुभव शेअर करताना सबाने सांगितले की, “त्यांनी चित्रपटातील एकही सीनचा सराव केला नव्हता. मला आठवत आहे की, सुरुवातीला एके दिवशी आम्ही दिल्लीला शूटिंग करण्यासाठी जात होतो. आम्ही कलाकार आणि क्रूसोबत काही डायलॉग म्हणालो. परंतु खरा सराव केला नाही.
हे माझ्यासाठी नवीन होते आणि एक वेगळा अनुभव होता. हीच गोष्ट मी इरफान सरांकडून शिकले आहे की, जास्त सराव करण्याची काहीही गरज नाहीये.”

तसेच तिने त्यांच्या जास्त संपर्कात न राहिल्याचे देखील दुःख व्यक्त केले आहे. तिने सांगितले की, इरफान खान यांची तब्येत ठीक नाही हे तिला समजले होते. ती त्यांना कॉल देखील करणार होती. परंतु शूटिंग आणि बाकी सगळ्या कामामुळे तिला त्यांना चालला करण्यास जमले नाही.

तिने सांगितले की, “चित्रपटानंतर जेव्हा मला समजले की, त्यांची तब्येत खराब झाली आहे. तेव्हा मी त्यांना चालला करण्याचा देखील विचार केला होता. परंतु शूटिंग आणि प्रवासामुळे मी हे विसरून गेले.
नंतर त्यासारख्या निधनाच्या बातमीने मी अगदी तुटून गेले होते. तेव्हा मला जाणवले की, मला वेळ होता तेव्हाच मी त्यांना भेटायला हवे होते, कारण एकदा गेलेली वेळ परत कधीच मागे पिरून येत नाही. जर तुम्हाला कोणाची माफी मागायची आहे किंवा तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर ते वेळेतच करा कारण एकदा वेळ ला
निघून गेल्यावर काहीही होणार नाही. त्यामुळे मला आता असे वाटत आहे की, जी मी तेव्हाच त्यांना कॉल केला असता किंवा भेटून आले असते तर किती चांगलं झालं असत.” अशाप्रकारे तिने इरफान खान यांच्या आठवणीत काही क्षण शेअर केले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा