महाराष्ट्र सरकार बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) ९ कोटी रुपये परत करणार आहे. त्यांच्या समुद्रकिनारी असलेल्या ‘मन्नत’ बंगल्याचा भाडेपट्टा बदलण्यासाठी त्यांनी केलेल्या जास्तीच्या रकमेसाठी ही रक्कम त्यांना परत केली जात आहे. प्रीमियमची गणना करताना चूक झाल्यानंतर अभिनेत्याने परताव्यासाठी अर्ज केला होता, जो आता मंजूर करण्यात आला आहे.
प्रीमियम वसूल करताना मोजणीत चूक झाल्यामुळे, अभिनेत्याकडून ९ कोटी रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आले. हे उघड झाल्यानंतर, त्यांचे पैसे त्यांना परत केले जातील. निवासी उपनगरीय जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी शनिवारी सांगितले की, २०१९ मध्ये शाहरुख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांनी वांद्रे येथील वारसा मालमत्तेचे भाडेपट्टा ‘क्लास १ मालकी’ मध्ये रूपांतरित केले आणि त्यासाठी सरकारला काही प्रीमियम भरला. त्यांनी सांगितले की प्रीमियमच्या मोजणीत काही चूक आढळल्यानंतर, अभिनेत्याने परताव्यासाठी अर्ज केला, जो या आठवड्यात मंजूर करण्यात आला.
भाड्याने घेतलेल्या बंगल्याची पूर्ण मालकी मिळविण्यासाठी अभिनेत्याने महाराष्ट्र सरकारला प्रीमियम म्हणून मोठी रक्कम भरली होती. अभिनेत्याने प्रीमियमसाठी २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे दिल्याचे वृत्त आहे, परंतु अधिकाऱ्यांनी याची त्वरित पुष्टी केली नाही.
दरम्यान, अभिनेत्याने नेहमीच त्याच्या बंगल्याचे ‘मन्नत’ हे त्याचे नशीब म्हणून वर्णन केले आहे. शाहरुख खानसाठी त्याच्या या बंगल्याचे विशेष महत्त्व आहे. २००५ मध्ये, ‘आय द इनर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान’ नावाच्या एका माहितीपटात, अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे सांगितले. त्यांनी ‘मन्नत’चाही उल्लेख केला आणि त्याला त्यांची सर्वात मौल्यवान संपत्ती म्हटले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘द अथर्व सुदामे शो’ला प्रेक्षकांचा जबदरस्त प्रतिसाद, ७ दिवसांत गाठला ‘एवढ्या’ व्हुव्जचा टप्पा
‘आज माझे वडील असते तर..’, पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भावुक झाले अजित कुमार