Wednesday, July 3, 2024

Brahmastra | चित्रपटाला का लागली ५ वर्षे? अखेर मौन तोडत रणबीर कपूरने केला खुलासा

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मोठ्या पडद्यावर जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी काळात रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून त्याचे पुनरागमन होणार आहे. पण गेल्या ५ वर्षांपासून ‘ब्रह्मास्त्र’ची चर्चा सुरू असून, आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत, रणबीर कपूरने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या या विलंबावर आपले मौन तोडले आहे. 

‘यामुळे’ ‘ब्रह्मास्त्र’ला लागली ५ वर्षे
सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपट ‘शमशेरा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, एका मीडिया मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’च्या विलंबाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना रणबीर कपूर म्हणाला की, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की ब्रह्मास्त्रला होणारा विलंब इतर कोणत्याही कारणामुळे नाही, तर चित्रपटाच्या कथेमुळे झाला आहे. आमचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट एका वेगळ्या पार्श्वभूमीवर बनत असून त्याला वेळ लागेल. १००, २०० किंवा ४० दिवसांत चित्रपट बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याचा परिणाम काय असेल. पण ब्रह्मास्त्रच्या विलंबावर मी म्हणेन की, यात कोरोनाचीही मोठी भूमिका आहे.” महत्त्वाचे म्हणजे, २०१७ मध्येच ‘ब्रह्मास्त्र’ची घोषणा झाली होती. (shamshera actor ranbir kapoor spoke about brahmastra five years delay)

‘या’ दिवशी रिलीझ होईल ‘ब्रह्मास्त्र’
बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ गेल्या ५ वर्षांपासून सतत चर्चेत आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट येईल, असे वाटत होते. पण कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेने तो अडकून राहिला. मात्र, बऱ्याच काळानंतर आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट यावर्षी ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे, जो पाहून चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा