टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात गाजलेला किंबहुना अजूनही गाजत असणारा आणि सर्वात जास्त काळ सुरु असणारा शो म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. या शोने प्रेक्षकांचे जे प्रेम मिळवले कदाचितच ते कुठल्या शोच्या नशिबात असेल. या शोने तर यश मिळवलेच सोबतच शोमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या कलाकाराला देखील मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र मागील काही काळापासून सतत शोबद्दल वाईट बातम्या येत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी हा शो सोडला. मागच्या वर्षी शैलेश लोढा, राज अनादकट या दोघानी शोला राम राम ठोकला. आता या शोमधील अजून एका व्यक्तीने शोमधून एक्सिट घेतली आहे.
View this post on Instagram
मागील १४ वर्षांपासून या शोचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक मालव राजदा यांनी देखील हा शो सोडला आहे. या शोला एवढे मोठे यश मिळवून देण्यात मालव यांचा मोठा वाटा होता. मात्र आता मालव यांनी शो सोडला असून त्यांच्यासोबतच ‘तारक मेहता’ मध्ये दिसणारी रिटा रिपोर्टर अर्थात अभिनेत्री प्रिया अहुजा देखील हा शो सोडणार असल्याचे समजत आहे. मालव राजदा आणि प्रिया हे खऱ्या आयुष्यात पतिपत्नी असून दोघानी हा शो सोडल्याचे सांगितले आहे.
मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार मालव यांनी प्रोडक्शन हाऊससोबत असलेल्या मतभेदांमुळे हा शो सोडल्याचे सांगितले जात आहे. मात्र मालव यांनी सांगितले की, “मागील १४ वर्षांपासून ते हा शो करत असल्यामुळे ते एका कम्फर्ट झोनमध्ये गेले आणि आता स्वतःला वेगळे काम करण्यासाठी अशा झोनमधून बाहेर येते आव्हान देण्यासाठी मी हा शो सोडला आहे. माझे कोणसोबतही मतभेद नाही. या शोसोबतचे १४ वर्ष माझे सर्वात सुंदर १४ वर्ष होते. या शोने मला पैसा प्रसिद्धी तर दिलीच सोबत माझी पत्नी देखील मला मिळवून दिली.”
तत्पूर्वी शोमध्ये अजूनही दया भाभी ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकाणीची लोकं आतुरतेने वाट बघत आहे. शोमध्ये जरी नवनवीन कलाकार आले असले तरी या शोच्या लोकप्रियतेत अजिबात कमतरता आली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गांधी गोडसे : एक युद्ध’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, चित्रपटात पाहायला मिळणार थरारक वैचारिक युद्ध
‘प्रभाससमोर ऋतिक रोशन काहीच नाही’, राजामौलींच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खळबळ