Thursday, June 19, 2025
Home साऊथ सिनेमा ‘पुष्पा २’ साठी अल्लू अर्जुनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार; तेलंगणा सरकारने केला सन्मान

‘पुष्पा २’ साठी अल्लू अर्जुनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार; तेलंगणा सरकारने केला सन्मान

१४ जून रोजी हैदराबाद येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात अनेक दक्षिण भारतीय कलाकारांना गद्दर चित्रपट पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी विविध श्रेणींमध्ये गद्दर तेलंगणा चित्रपट पुरस्कार २०२४ प्रदान केले. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा-२’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही देण्यात आला आहे.

शनिवारी रात्री एका भव्य कार्यक्रमात, रेड्डी यांनी उप मल्लू भट्टी विक्रमर्क यांच्यासमवेत ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना पॅडी जयराज चित्रपट पुरस्काराने सन्मानित केले. अभिनेते एन बालकृष्ण यांना एनटीआर चित्रपट पुरस्कार देण्यात आला. विजय देवेराकोंडा यांना ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कांथा राव यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०४७ पर्यंत तेलंगणाला ३ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवायची आहे आणि यामध्ये चित्रपट आणि चित्रपट उद्योगाची भूमिका खूप महत्त्वाची असेल.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दिग्दर्शक एसएस राजामौली म्हणाले की, ‘हॉलिवूड आणि बॉलिवूडने हैदराबादला आपले घर बनवावे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार चित्रपट उद्योगाला पाठिंबा देण्यास तयार आहे.’ पुरस्कार सोहळ्यात बालकृष्ण यांनी दिवंगत लोकगायक आणि गीतकार गद्दर यांचे स्मरण केले, ज्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात.

‘पुष्पा २’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अल्लू अर्जुनने आनंद व्यक्त केला. आपल्या भाषणात त्यांनी सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा २’ या चित्रपटांनी संपूर्ण भारतात खूप कमाई केली. हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांना आवडला आहे.

हे देखील वाचा