Monday, July 1, 2024

कॅन्सरचे निदान झाल्याच्या बातम्यांवरून चिरंजीवी संतापले मीडियावर, जाणून घ्या काय म्हणाले अभिनेता

टॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी कायमच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असतात. अशात नुकतेच चिरंजीवी मीडियावर रागावल्याने चर्चेत आले आहे. चिरंजीवी यांनी मीडियावर काय नाराजी व्यक्त केली आहे? चला, जाणून घेऊया…

खरे तर, चिरंजीवी (chiranjeevi) कॅन्सरपासून वाचल्याची बातमी नुकतीच प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. या सोबतच अभिनेत्याला कॅन्सर झाला असून ते या आजारातून थोडक्यात बचावले असे माध्यमांनी सांगितले. अशात मीडियामध्ये पसरलेल्या या बातम्यांवर चिरंजीवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अफवा मीडियात पसरल्यानंतर अभिनेत्याच्या लाखो चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. चिरंजीवी पूर्णपणे ठिक आणि फिट आहेत. अशात मीडियाला त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही.

चिरंजीवी अनेक गरजूना करतात मदत
चिरंजीवीबद्दल या गोष्टी प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या असल्या तरी अभिनेता त्यांच्या अनेक उदात्त कृत्यांमुळे चर्चेत राहतात. लोकांच्या मदतीसाठी चिरंजीवी राज्यात आणि बाहेरही अनेक ब्लड बॅंक चालवतात, ज्यातून लोकांना अनेक फायदे मिळतात. यासोबतच ते लोकांच्या भल्यासाठी इतरही अनेक कामे करतात.

नुकतेच चिरंजीवी यांनी या गोष्टीवरही भर दिला की, भविष्याचा विचार करून लोकांनी त्यांच्या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना भयंकर आजारांपासून वाचवता येईल.

चिरंजीवी यांचे वर्कफ्रंट
चिरंजीवी यांचे सर्व चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. अशात अभिनेता लवकरच भोला शंकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच ते इतरही काही प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.(tollywood actor chiranjeevi angry on media the false reports of being diagnosed with cancer see about full details)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोरोना काळात गमावलेला जादूई आवाज,एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर होता ‘हा’ विश्वविक्रम

ब्रेकिंग! प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शाेककळा

हे देखील वाचा