अरबी समुद्रातून सुरू झालेले तौत्के चक्रीवादळाने भयानक रूप धारण केलेले दिसले आहे. ते पाहता प्रशासन, आणि सुरक्षा पथक सतर्क आहेत. त्याचबरोबर या वादळामुळे महाराष्ट्रात मोठे नुकसान होत आहे. या वादळामुळे मुंबई ठप्प झाली आहे. याचा उद्रेक मुंबईसह महाराष्ट्रातील इतरही भागात दिसून येत आहे. यासह गोवा आणि गुजरातमध्येही याचा परिणाम दिसून येत आहे. गुजरातमधील वापी शहरात सध्या बऱ्याच टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू आहे. अशा परिस्थितीत वादळामुळे टीव्ही मालिकांचे शूटिंगही ठप्प झाले आहे. अशातच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेलाही या वादळाचा जोरदार फटका बसला आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा अभिनेता करण कुंद्राच्या इंस्टाग्राम फॅन पेजने या वादळाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सेटचा आहे. व्हिडिओमध्ये आपण हे पाहू शकता की, वादळाने शोचा सेट कसा उद्ध्वस्त केला आहे. व्हिडिओमध्ये क्रू मेंबर्सही सैरावैरा धावताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये क्रू मेंबर्स पळा-पळा म्हणताना दिसत आहे. वादळामुळे सर्व क्रू मेंबर्स धावपळ करत सेटच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ त्याने शेअर करताच, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले, तर करण कुंद्रा आणि व्ही.जे. अनुषा दांडेकर यांनी वर्ष २०२० मध्ये ६ वर्षांचे नाते संपवले होते. दोघेही बर्याच दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, पण आता दोघेही वेगळे झाले आहेत.
कोरोनामुळे महाराष्ट्रात सगळीकडे गंभीर परिस्थिती आहे, यामुळेच अनेक मालिकांचे शूटिंग हे महाराष्ट्राबाहेर सुरू आहे. संपूर्ण टीम काळजी घेऊन शूटिंग करत होते, परंतु तौत्के चक्रीवादळाने परत एकदा मालिकांसमोर मोठे संकट उभे केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी
-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन
-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल