Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड राज- नर्गिस ते दिलीप- मधुबाला, बॉलिवूडमधल्या ‘या’ जोड्या प्रेम एक होण्यासाठी तरसल्या

राज- नर्गिस ते दिलीप- मधुबाला, बॉलिवूडमधल्या ‘या’ जोड्या प्रेम एक होण्यासाठी तरसल्या

‘जोड्या स्वर्गात तयार होतात’ हे वाक्य तुम्ही अनेकदा अनेकांकडून १०० टक्के ऐकलंच असेल, आणि त्यातही ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणंही प्रत्येक जोडपं आपल्या जोडीदाराला म्हणत असतं. जोड्या स्वर्गात तयार होतात, असं म्हणत असले, तरीही बॉलिवूडमध्येही अशा जोड्या काही जोड्या होत्या, ज्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, पण शेवटी त्यांचं प्रेम एक झालंच नाही. प्रत्येक दशकात एक अशी जोडी बनली, ज्यांनी सिनेमांपेक्षाही जास्त आपल्याकडेच सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आम्ही या लेखातून त्या जोड्यांबद्दल सांगणार आहोत, कदाचित त्या तुम्हाला माहितीही नसतील.

राज कपूर आणि नर्गिस
पन्नासच्या दशकात ‘आवारा’ सिनेमा बनवला जात होता. हा सिनेमा बनत असतानाच राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमाला बहर आला. ही जोडपं खऱ्या आयुष्यासोबतच सिनेमातही एकमेकांची जोडी बनली. त्यांनी तब्बल १६ सिनेमात एकत्र काम केलं. असं म्हणतात की, राज कपूर आणि नर्गिस यांच्या रोमान्सची चर्चा थेट कपूर खानदानापर्यंत पोहोचली होती. राज कपूर यांची पत्नीला जेव्हा याबद्दल समजलं होतं, तेव्हा ती आपलं गाठोडं बांधून माहेरला गेली होती. पण राज कपूर यांच्या प्रेमप्रकरण सुरूच होतं. पण एक ना एक दिवस ही जोडी तुटलीच. नर्गिस यांनी पुढं सुनील दत्त यांच्यासोबत लग्न केलं. याचा राज कपूर यांना मोठा फटका बसला होता. त्यांना हे सहन न झाल्याने ते सैरभैर झाले. ते नर्गिस यांच्या लग्नानंतर खूपच दारू पिऊ लागले. दारू पिऊन ते तासंतास बाथटबमध्ये बसून राहायचे. स्वतःला ते सिगरेटचे चटके देखील द्यायचे, जेणेकरून हे स्वप्न वाटावे आणि ते त्या चटक्यांनी स्वप्नातून जागे व्हावे. पण काहीही म्हणा राज कपूर आणि नर्गिस याची लव्हस्टोरी या सिनेइंडस्ट्रीतली सर्वात गाजलेली आणि अमर लव्हस्टोरी आहे.

गुरू दत्त आणि वहीदा रहमान
राष्ट्रीय पुरस्कार, ३ फिल्मफेअर आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे वहीदा रहमान. वहीदा रहमान यांनी १९५५ पासून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यांना पहिला सिनेमा ज्या व्यक्तीने दिला, ते म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी. गुरुदत्त यांनी वहीदा रहमान यांना १९५६ च्या ‘सीआयडी’मधून बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. या सिनेमादरम्यानच गुरुदत्त वहीदांच्या प्रेमात पडले. पाहता क्षणीच वहीदा त्यांना ‘चौदहवीं का चाँद’ वाटल्या होत्या. गीता दत्त त्यांची पत्नी होती. या प्रेमकथेचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरही झाला. कुटुंब तुटल्यानंतरही गुरु दत्त प्रेमात पडून राहिलेले. अत्यंत संवेदनशील असलेल्या गुरुदत्त यांना त्यांचे प्रेम मिळणे कठीण होते. या परिस्थितीने त्यांना एकाकीपणा आणि दुःखाकडे ढकलले. यामुळेच गुरु दत्त यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमागे कुठेतरी त्यांच्या प्रेमाचे अपयश असल्याचे बोलले जाते. त्यामुळे गुरुदत्त आणि वहीदा यांचीही लव्हस्टोरी टिकली नाही.

दिलीप कुमार आणि मधुबाला
लव्हस्टोरीचा विषय निघाला आणि त्यात दिलीप कुमार- मधुबाला यांच्या लव्हस्टोरीची चर्चा होणार नाही, असं कधीच होणार नाही. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या लव्हस्टोरीमध्ये खूपच चढ-उतार होते. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. पण मधुबालाच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. मधुबालावर सतत लक्ष ठेवलं जायचं. पण लाख प्रयत्नानंतरही ते एकमेकांवर प्रेम करत राहिले. शेवटी एके दिवशी दिलीप कुमार मधुबालाला म्हणाले की, “लग्न तर होईल, पण लग्नानंतर तुला वडिलांसोबतचे संबंध तोडावे लागतील.” मधुबालाला हे मान्यच नव्हतं. शेवटी ही लव्हस्टोरीचा द एंड झाला. त्यानंतर दिलीप कुमार यांच्या आयुष्यात सायरा बानो यांची, तर मधुबाला यांच्या आयुष्यात किशोर कुमार यांची एंट्री झाली.

सुरैया आणि देव आनंद
प्रत्येक लव्हस्टोरीमध्ये एक तरी व्हिलन असतोच असतो. असाच एक व्हिलन सुरैया आणि देव आनंद यांच्या लव्हस्टोरीमध्येही होता. नेहमीच जोडप्याच्या लव्हस्टोरीचा व्हिलन हा मुलीचा बाप किंवा तिची आई तर असते. पण यावेळी सुरैया आणि देव आनंद यांच्या लव्हस्टोरीतील व्हिलन सुरैयाची आजी होती. त्यांना सुरैयाचे देव आनंद यांना भेटणे आवडत नव्हते. सुरैयाला देव आनंदमध्ये आपल्या लहानपणीचा हिरो ग्रेगरीची प्रतिमा दिसायची. देव आनंद यांनी जीवतोड मेहनत घेतली. त्यांनी साखरपुड्याची अंगठीसुद्धा बनवून घेतलेली. पण काही जमलंच नाही. त्यांचं सुरैया यांच्यासोबत लग्न झालंच नाही. सिनेमापासून वेगळे झाल्यानंतर सुरैया शेवटपर्यंत एकट्याच राहिल्या. सार्वजनिक ठिकाणी जाणंही त्यांनी सोडून दिलं. त्यांचा लव्हस्टोरीचा शेवट खूपच वाईट झाला. मात्र, देव आनंद यांनी कल्पना कार्तिक यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना सुनील आणि देवीना ही दोन मुलं आहेत.

अमिताभ बच्चन आणि रेखा
पडद्यावर प्रेक्षकांचं सर्वाधिक प्रेम मिळालेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची. त्यांनी एकूण १० सिनेमात एकत्र काम केलं. त्यापैकी ९ सिनेमे रिलीझ झाले, पण एक सिनेमा आजपर्यंत रिलीझ झाला नाही. त्या ९ सिनेमात अनेक हिट सिनेमे होते. तो सिनेमा होता ‘अपना पराया’. अमिताभ आणि रेखा यांनी पहिल्यांदा १९७६ साली एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या दोघांनी कधीच खुलेपणाने आपलं प्रेम व्यक्तच केलं नाही. पण शेवटी ‘सिलसिला’ सिनेमा त्यांची लव्हस्टोरी दाखवून देतो. इंडस्ट्रीत सर्वांच्या तोंडात अमिताभ आणि रेखा यांचंच नाव होतं. पण शेवटी या लव्हस्टोरीचाही द एंड झालाच. आजपर्यंत रेखा या एकट्या आयुष्य जगतायत, तर अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलंही आहेत. त्यांचा मुलगा अभिषेकही अभिनेता आहे. अमिताभ आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीची आजही चर्चा होतेच होते.

या होत्या एकेकाळच्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ५ जोड्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘त्या’ भयानक किस्स्यामुळं इरफान अनेक दिवस बेडरूममध्येच होता पडून, बाहेर जाण्यासही भरायची धडकी
विनोद मेहरांचा एक पॉईंट हुकला अन् राजेश खन्ना बनले सुपरस्टार; सलग १५ सिनेमे दिले सुपरहिट
‘कट कट कट’, म्हटले तरीही किस करायचे थांबले नाहीत ‘हे’ कलाकार; दीपवीर तर सुसाट सुटलेले

हे देखील वाचा