Monday, July 8, 2024

लोकप्रिय ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून उर्मिला कोठारे बाहेर, समोर आले कारण

सध्या स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका घराघरात लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नव्यानेच ही मालिका सुरू होवूनही अल्पावधीत मालिकेने जोरदार पसंती पाहायला मिळत आहे. मात्र आता मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेल्या उर्मिला कोठारे (Urmila Kothare) लवकरच मालिकेतून बाहेर पडणार असल्याची बातमी समोर आली आहे. काय आहे उर्मिलाने मालिका सोडण्याचे कारण चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री उर्मिला कोठारे बराच काळ कोणत्याच छोट्या पडद्यावरुन लांब गेली होती. त्यानंतर आता मी तुझेच गीत गात आहे या मालिकेतून तब्बल १२ वर्षांनी तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. मालिकेत उर्मिलाने वैदहीची प्रमुख भूमिका साकारली आहे.तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. स्वरा आणि वैदही यांच्या गोड नात्याची कथा या मालिकेत सांगितली आहे. पण मालिकेत वैदयीचा कॅन्सरमुळे मृत्यू होणार आहे. त्यामुळेच मृत्यू झाल्यानंतर उर्मिला कोठारेही मालिकेतून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

सध्या सोशल मीडियावर याबद्दलचा प्रोमो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वैदहीचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत वैदहीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. वैदहीच्या उपचारासाठी स्वरा सर्वत्र गाण्याचे कार्यक्रम करुन पैसे गोळा करत असल्याचेही दाखवण्यात आले होते. परंतु वेळेत उपचार न झाल्याने वैदहीचा मृत्यू होतो.त्यामुळे आता उर्मिला या मालिकेतून बाहेर पडणार हे निश्चित झाले आहे. परंतु याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या मालिकेच्या पुढील कथेकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा