Tuesday, July 9, 2024

‘…नाहीतर मालिका बंद करा’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका पाहून प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त

छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ओम स्वीटूची लव्हस्टोरी देखील सर्वांना खूप आवडली आहे. पण मागील काही दिवसांपासून ही मालिका खूप ट्रोल होत आहे. या मालिकेत काही सीनची एवढी अतिशयोक्ती केली जाते की, प्रेक्षक कंटाळून मालिका पाहणे बंद करतात. या मालिकेवर अनेक मीम्स तयार होत आहे. या मालिकेत आता अनेक नवीन वळणं आली आहेत. त्यात रविवारी ( २२ ऑगस्ट) या मालिकेचा महाएपिसोड दाखवला गेला आहे. या एपिसोडकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होती, पण हा एपिसोड पाहून सगळ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत एक मोठं वळणं आलं होतं. ओमने अनेक परिश्रम करून स्वीटूच्या आईचे म्हणेजच नलू मावशीचे मन जिंकले होते. तिने देखील स्वीटू आणि ओमच्या लग्नाला होकार दिला होता. पण ओमची बहीण मालविका मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांचे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत असते. त्यांचा साखरपुडा, मेहेंदी, हळद हे कार्यक्रम दाखवले होते. त्यामुळे आता लग्न देखील थाटामाटात होईल अशी प्रेक्षकांना आशा होती. पण मालिकेच्या महाएपिसोडने सगळ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. (yeu kashi tashi mi nandayala serial get troll)

या मालिकेत ओम स्वीटूच्या बाबांना शोधायला भर मांडवातून निघून जातो. येथे मालविका आणि मोहित सर्वांना ओम लग्नातून पळून गेला असे सांगतात. नाईलाजाने स्वीटूला मोहितशी लग्न करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे सांगून तिला लग्नासाठी तयार करतात. त्या दोघांचे लग्न झालेले दाखवले आहे. हे सगळं पाहून प्रेक्षक अक्षरशः संतापले आहे. स्वीटूचे लग्न झाले तरी मुलीचा बाप मंडपात नाहीये, ही गोष्ट कोणाच्याही कशी लक्षात आली नाही. तसेच ओमने इतर कोणाला कॉल का केला नाही असे म्हणत आहेत.

प्रेक्षक या मालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे या मालिकेवर जोरदार मीम्स बनवले जात आहे. प्रेक्षक देखील सोशल मीडियावर त्यांचा संताप व्यक्त करत आहे. या युजरने लिहिले आहे की, “किती नशा करून तुम्ही मालिका लिहिता?” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हा निव्वळ फालतूपणा आहे, प्रेक्षकांना मूर्ख समजून तुम्ही काहीही दाखवता.” आणखी एकाने लिहिले आहे की, “दाखवायच म्हणून काहीही वाढवताय, त्यापेक्षा मालिका बंद करा.” प्रेक्षक खूप संतापले आहेत. त्यामुळे आत येणाऱ्या भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणे महत्वाचं ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा