Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘हिंमत नाही पाय मोडला आहे….,’ अस म्हणत दिग्गज गीतकार यांनी सांगितला जीवनातील संघर्ष; एकदा वाचाच

‘हिंमत नाही पाय मोडला आहे….,’ अस म्हणत दिग्गज गीतकार यांनी सांगितला जीवनातील संघर्ष; एकदा वाचाच

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गीतकार संतोष आनंद यांची गाणी तर सर्वांनी ऐकली असेलच. ‘एक प्यार का नगमा है’ आणि ‘मैं ना भूलूंगा’ यांसारखी अविस्मरणीय गाणी त्यांनी लिहिली आहे. पण तुम्हांला त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी माहित आहे का? त्यांचे जीवन हे दुख आणि संघर्षाने भरलेले होते. ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर त्यांनी त्यांच्या जीवनाची गोष्ट दुःखमय होती ते सांगितले, तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. 

संतोष आनंद यांना त्यांच्या प्रियजनांची सर्वात जास्त गरज असताना ते एकटेच होते. हृदयात दु:खाचा महासागर घेऊन गीतकार जेव्हा ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर पोहोचला, तेव्हा त्याची दुःखद कहाणी ऐकून करोडो लोक भारावून गेले. आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख सोसून त्यांनी मंचावरून ‘हौसला नहीं टूटा है, टांग टूटी है’, म्हणजेच ‘हिंमत तुटली नाही पाय मोडला आहे असे म्हणताच आदर आणि प्रेमाने सर्व त्यांच्यापुढे झुकले.

मुलगा गमावण्याचे दु:ख संतोष आनंद यांच्यापेक्षा कोण चांगल समजू शकते. ज्याचा मुलगा संकल्प आनंद याने 2014 मध्ये पत्नीसह आत्महत्या केली होती. वयाच्या 83 व्या वर्षी जेव्हा शरीराने हार मानायला सुरुवात केली, तेव्हा आयुष्याने त्यांना खोलवर जखमा केल्या. त्यांनी ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर आर्थिक अडचणी बदल सांगितले. त्यावेळी किरकोळ बिले भरणेही त्यांना अवघड जात होते.

लग्नाच्या दहा वर्षांनी संतोष आनंद यांचा मुलगा संकल्प याचा जन्म झाला. त्यांचा मुलगा मानसिक त्रासाने त्रस्त होता आणि त्याने आत्महत्या करण्यापूर्वी 10 पानी सुसाईड नोट लिहून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रात कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचाही उल्लेख होता. संकल्प गृह मंत्रालयातील आयएएस स्तरावरील अधिकाऱ्यांना क्रिमिनोलॉजी आणि समाजशास्त्र शिकवायचे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गीतकाराचा मुलगा संकल्प आपल्या पत्नीसोबत 15 ऑक्टोबर 2014 रोजी दिल्लीहून मथुरा येथे गेला होता. कोसीकलन शहराजवळील रेल्वे रुळावर रेल्वेसमोर येऊन दोघांनी आपले जीवन संपवले होते. या अपघातात मुलगी थोडक्यात बचावली. मुलाच्या निधनानंतर ते एकट्यानेच वेळ घालवू लागले आहे. सिकंदराबाद, बुलंदशहर येथे जन्मलेल्या संतोष आनंदने ‘शोर’ चित्रपटासाठी ‘एक प्यार का नगमा है’ हे सर्वात अविस्मरणीय गाणे लिहिले आहे. त्यांनी ‘जिंदगी की ना टूटे लडी’ आणि ‘मोहब्बत है क्या चीज’ सारखी उत्तम गाणी लिहिली.

संतोष आनंद यांनी दिल्लीत ग्रंथपाल म्हणून काम केले होते. कवितांच्या आवडीमुळे ते कवी संमेलनांना हजेरी लावत असत. 1970 मध्ये त्यांच्या आयुष्यातला तो क्षण आला, जेव्हा त्यांना पहिल्यांदा या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची संधी मिळाली आणि तो चित्रपट होता ‘पूरब और पश्चिम’ ज्यामध्ये त्यांचे ‘पूर्वा सुहानी आई रे’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. त्यांना त्यांच्या गाण्यांसाठी फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. आज भलेही ते गरिबीत दिवस काढताना दिसत असले तरी कवी आणि गीतकाराचे मन आणि आत्मा खूप समृद्ध आहे. (indian-lyricist-santosh-anand-painfull-story-about-his-life)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रींच्या वडिलांनीच केले होते तिचे लैंगिक शोषण, स्वतःच केला मोठा खुलासा
धक्कादायक! ए.आर. रहमान यांचा मुलगा अमीन याच्यासोबत मोठा अपघात; 3 दिवसानंतरही गायक शॉकमध्ये

हे देखील वाचा