Saturday, July 25, 2026
Home अन्य या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय, तर आता या चित्रपटाच्या सिक्वेलची रंगली चर्चा

या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय, तर आता या चित्रपटाच्या सिक्वेलची रंगली चर्चा

अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय अभिनीत ताल हा चित्रपट त्या काळी प्रंचड गाजला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. तसेच त्यातील गाणी ही खुप गाजली आहेत. आणि आजही त्या गाण्यांना प्रेक्षक विसरु शकले नाहीत या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. तर ही चित्रपट जरी गाजली तरी या चित्रपटाला IMDb वर 6.7 चे रेटिंग मिळाले आहे. हे रेंटीग अपेक्षेपेक्षा कमी होते. तर आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यानी या चित्रपटच्या सिक्विल बाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

सुभाष घई यांनी या पोस्ट मध्ये म्हणले आहे की, ‘ताल’साठी मला मिळालेली सर्वोत्तम प्रशंसा हॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांच्याकडून होती. शिकागोमधील 2005 च्या एबर्टफेस्टमध्ये माझ्या ‘ताल’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान त्यांनी ही प्रशंसा दिली. त्यांच्या समीक्षेत, त्यांनी चित्रपटाच्या निखळ मनोरंजनाची आणि निरागसतेची प्रशंसा केली. त्यामळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. सुभाष घई यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा विचार केल्यास, ‘ताल’ पहिल्या क्रमांकावर येतो. तर पुढे ताल 2 बाबात हि बोलले.

ताल (taal)2 बाबात बोलताना ते म्हणाले की, मी अजुन काही प्रतिभावान कलाकांरासोबत काम करुन ताल 2 बनवु का ? असे ते म्हणले. तसेच ताल या चित्रपटामध्ये ऐश्वर्या आणि अक्षय यांच्या व्यतिरिक्त, या चित्रपटात अनिल कपूर, अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांनीहि खुप महत्वाच्या भुमिका बजावल्या होत्या. आणि याचा अभिनय आणि यातील गाणी प्रेक्षकांना प्रंचड भावल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा

संघर्ष, अश्रू आणि 8 अपयशी IVF प्रयत्नांनंतर संभावना सेठच्या घरी आनंदाचे क्षण

 

हे देखील वाचा