स्वयंघोषित चित्रपट समीक्षक असणारा कमाल आर खान म्हणजेच केआरके नेहमीच त्याच्या बेताल आणि विवादित वक्तव्यांनी सतत चर्चेत आहे. त्याच्या ट्विट्समुळे तो स्वतःवर वाद ओढवून घेत असतो, तरीही तो त्याचे ट्विट्स करणे काही केल्या बंद करत नाही. सलमान खान, कंगना रणौत, मिका सिंग, विद्या बालन आदी अनेक कलाकारांवर वक्तव करणाऱ्या केआरकेने पुन्हा ट्वीट केले आहे.
केआरकेने आता त्याचा मोर्चा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याकडे वळवला आहे. त्याने या दोघांच्या लग्नाबद्दल दोन भविष्यवाण्या केल्या आहेत. यात त्याने त्यांचे लग्न कधी होईल आणि पुढे काय होईल ते सांगितले आहे.
याबद्दल ट्वीट करताना त्याने लिहिले की, “रणबीर कपूर आणि आलिया भट्ट २०२२ संपायच्या आत हे लग्न करतील. मात्र, रणबीर कपूर तिच्याकडून १५ वर्षानंतर घटस्फोट घेईल.”
Prediction 08- Ranbir Kapoor and Alia Bhatt will get married max till end of 2022. But Ranbir Kapoor will divorce her within 15 years after marriage!
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2021
त्याचे हे ट्वीट वाचून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकाने लिहिले की, “तू प्रत्येक गोष्टीसाठी अंदाज का बांधत आहेस? काही चांगले बोलू शकत नाही का?” आणखी एकाने लिहिले, “बकवास, अशा प्रकारचे अंदाज का बांधत आहेस?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “अंदाज बांधताना स्वतःचे भविष्य पाहायला विसरू नको. कोणाच्या हातून मरणार आहेस ते पण बघ.” पुढे आणखी एकाने लिहिले की, “प्रभू तू महान आहेस माझे लग्न आणि घटस्फोट कधी होईल ते सांग.” अजून एक लिहतो, “सलमानने तर सोडून दिले पण इतरांशी पंगा का घेतोय?”
केआरकेने याआधी तब्बू आणि कंगना यांच्या लग्नाबद्दल देखील अंदाज बांधला होता. तो याबद्दल म्हणाला होता की, या दोघी कधीही लग्न करणार नाही. सध्या केआरके आणि वाद हा एकच शब्द झाला आहे. त्याने सलमानशी घेतलेला पंगादेखील चांगलाच चर्चेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??