बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. काही कलाकार असे असतात, जे फक्त आपल्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते चाहत्यांच्या चांगल्या- वाईट कमेंट्सची कधीही काळजी करत नाहीत. मात्र, याउलट असेही कलाकार असतात, जे सोशल मीडियावर फक्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याव्यतिरिक्त ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्यातही मागे-पुढे पाहत नाहीत. यापैकीच एक कलाकार म्हणजे मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी होय. स्वप्नीलने ट्रोल करणाऱ्या एका ट्रोलरला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या देशात वेगवेगळे गंभीर प्रकरणं सुरू आहेत. त्यात शेतकरी आंदोलन, लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना आणि ‘गोडसे’ चित्रपटावरून उभा ठाकलेला वाद यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. यावर अनेक कलाकार आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत, तर काहींनी मौन बाळगण्याचा निर्णय घेतला. मात्र, कलाकारांचे हे वागणे काही युजर्सना पटले नाही. (Marathi Actor Swapnil Joshi Reply To Troller)
मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने काही दिवसापूर्वी ट्विटरवर प्रश्नउत्तरांचं सेशन ठेवले होते. यादरम्यान चिडलेल्या एका युजरने त्याला प्रश्न विचारला की, “स्वप्नील तू अजून शेतकरी आंदोलन, कालची लखीमपूरची घटना, मांजरेकरच्या गोडसे चित्रपटाबद्दल अजून व्यक्त का झाला नाही?” युजरच्या या प्रश्नावर स्वप्नीलनेही सडेतोड प्रत्युत्तर दिले.
स्वप्नील तू अजून शेतकरी आंदोलन, कालची लखीमपूर ची घटना, मांजरेकर च्या गोडसे चित्रपटाबद्दल अजून व्यक्त का झाला नाही?@swwapniljoshi https://t.co/IjMZM1Qs9a
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) October 5, 2021
स्वप्नीलने या युजरच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत म्हटले की, “कारण आम्हा कलाकारांना अकला नाहीत! आम्हाला, नको तिथे नाक खुपसू नका; असा सल्ला इथेच मिळालाय!आपण वाचला नाहीत!???”
कारण आम्हा कलाकारांना अकला नाहीत ! आम्हाला, नको तिथे नाक खुपसू नका ; असा सल्ला इथेच मिळालाय !
आपण वाचला नाहीत !??? https://t.co/Yn2w8m5Uev
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) October 5, 2021
स्वप्नीलचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्याच्या या ट्वीटला आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक लाईक्स आणि १२८ पेक्षा रिट्विट मिळाले आहेत. त्याचबरोबर १०५ युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्वप्नीलच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘समांतर’ या टीव्ही सीरिजमध्ये झळकला होता. याव्यतिरिक्त त्याने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारला आहे. त्यामध्ये ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘तू ही रे’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, ‘फ्रेंड्स’, ‘लाल इश्क’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस
-लग्नाला १० वर्षे पूर्ण: ‘…नवं माझं राज!’ उखाणा घेत, प्रियाने शेअर केला लग्नातील खास व्हिडिओ