सध्या चित्रपटसृष्टीत एक विषय चांगलाच चर्चेत आहे, तो म्हणजे कंगना रणौतचे स्वातंत्र्यावरील वादग्रस्त वक्तव्य होय. कंगनाच्या वक्तव्याने चांगलाच वाद पेटला आहे. कंगनाला चोहोबाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशातच आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्याचे समर्थन केले आहे. मात्र, यामुळे चांगलाच वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय होते कंगनाचे वक्तव्य?
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले होते. कंगनाने वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले होते की, “१९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते आणि जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते २०१४ मध्ये मिळाले आहे.”
विक्रम गोखलेंचा कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा
पुण्यात ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना गौरवण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. (Actor Vikram Gokhale Says I Agree With Kanganas Statement The Country Got Its Freedom From Begging)