Sunday, June 8, 2025
Home अन्य घटस्फोटानंतर आपल्या तुटलेल्या नात्यावर काय म्हणाले आमिर अली आणि संजीदा शेख?

घटस्फोटानंतर आपल्या तुटलेल्या नात्यावर काय म्हणाले आमिर अली आणि संजीदा शेख?

मनोरंजनविश्वात खूपच सहज नाती जुळतात आणि तेवढ्याच सहज तुटतात देखील मात्र घटस्फोट किंवा ब्रेकअप या दोन्ही गोष्टी सामान्य असो किंवा सेलिब्रिटी कोणासाठीही त्रासदायकच असतात. बॉलिवूड आणि टेलिव्हिजनविश्वात मागच्या काही काळात अनेक जोड्या वेगळ्या झाल्या. मात्र या सर्वांमध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल असलेल्या आमिर अली आणि संजीदा शेख यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. नुकताच या दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यांनी त्यांचा नऊ वर्षाचा संसार मोडला. या दोघांकडून अजून यावर कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आले नाही. मात्र या दोघांना एका मुलाखतीदरम्यान यावर प्रश्न विचारण्यात आला, मात्र यावर कोणीही काहीच भाष्य केले नाही.

एका मोठ्या मीडियाहाऊसने संजीदाला याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मी यावर काहीच बोलू इच्छित नाही. मी आता सध्या माझ्या कामातून माझ्या मुलीला गर्व कसा वाटेल यावर लासखा केंद्रित करत आहे, आणि मला माहित आहे हे लवकरच होईल.” तर दुसरीकडे आमिर अली म्हणाला, “मी अशा कोणत्याही प्रकारच्या बातमीवर कमेंट करू इच्छित नाही, जी सध्या बाहेर फिरत आहे. मी याला अतिशय साधे, स्वच्छ आणि सिंपल ठेऊ इच्छितो. सध्या मी फक्त संजीदा आणि माझ्या मुलीला सुरक्षित ठेऊ इच्छितो.”

आमिर आणि संजीदा यांनी लग्नाच्या आधी काही वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी डान्सिंग शो ‘नच बलिये ३’मध्ये सहभाग घेतला आणि हा शो जिंकला देखील. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. त्यानंतर मार्च २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले आणि ऑगस्ट २०२० मध्ये ते सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचे आईबाबा झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव आर्या अली ठेवले. मात्र आर्याच्या जन्मानंतर काही महिन्यांनी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि नुकताच त्यांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा :

हे देखील वाचा