Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये काम केल्यानंतर ‘हा’ अभिनेता झाला होता डिप्रेशनचा शिकार, म्हणाला….

‘द कश्मीर फाइल्स’मध्ये काम केल्यानंतर ‘हा’ अभिनेता झाला होता डिप्रेशनचा शिकार, म्हणाला….

‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले आहेत. पण अजून देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काश्मीर फाइल्स १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्यासाठी काही पावले मागे आहेत. चारहीबाजूंनी वाहवा मिळवणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या मेहनतीचे कौतुक होत असून, अनुपम खेर यांच्यापासून पल्लवी जोशीपर्यंत या चित्रपटातील प्रत्येक पात्रांचा अभिनय अंगावर शहारे आणणारा आहे. या चित्रपटात कृष्णा पंडितच्या भूमिकेत दिसलेल्या दर्शन कुमारच्या अभिनयाचे देखील जोरदार कौतुक होत आहे.

अभिनेता दर्शन कुमारने (Darshan Kumar) अलीकडेच एका मुलाखतीत ‘द काश्मीर’ या चित्रपटाविषयीचा अनुभव शेअर केला आहे. माध्यमांशी बोलताना दर्शन कुमारने त्याला चित्रपटात काम कसे मिळाले आणि त्याचा अनुभव काय होता हे सांगितले. अभिनेत्याने सांगितले की, त्याला प्रथम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सर आणि पल्लवी मॅडम यांनी खऱ्या पीडितेचा व्हिडिओ दाखवला, जेणेकरून त्याला गोष्टी समजू शकतील. दर्शनने मुलाखतीदरम्यान सांगितले की, व्हिडिओमधील लोकांच्या वेदना पाहिल्यानंतर त्याने ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला होता.

दर्शन कुमारने मुलाखतीत सांगितले की, या भूमिकेचा त्याच्यावर इतका भावनिक प्रभाव पडला की, तो डिप्रेशनमध्ये गेला. त्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी त्याने सुमारे दोन आठवडे ध्यानधारणा केली. अभिनेता म्हणाला की, जेव्हा लोक चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडत होते. तेव्हा ते भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि रडत बाहेर आले. पण तो ४० दिवस ते पात्र जगला आहे. दर्शन कुमार या मुलाखतीत बोलताना म्हणाला की, हे खूप वेदनादायक होते, आतापर्यंतच्या आयुष्यात त्याने साकारलेल्या सर्व पात्रांपैकी हे सर्वात कठीण आहे.

या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार, पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मिरी पंडित, हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कथा आहे.

या चित्रपटात काश्मिरी नरसंहाराचे वेदनादायक आणि भावनिक चित्र रेखाटण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले होते ही कथा पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते. कारण काश्मिरी पंडितांचे पलायन हा भारतीय राजकारणातील महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे डोळे उघडण्याचे काम करणार आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपापली पात्रे जगली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा