‘बाहुबली’ प्रदर्शित झाल्यापासून तेलुगू सिनेमातील अभिनेता प्रभासची लोकप्रियता भारतभर वाढली आहे. प्रभासने मेगा-बजेट चित्रपट ‘आदिपुरुष’चे शूटिंग पूर्ण केले आहे आणि लवकरच तो कन्नड-तेलुगू ऍक्शन थ्रिलर ‘सालार’मध्ये व्यस्त होणार आहे. तो सध्या त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून प्रभास आणि पूजा हेगडे पहिल्यांदाच एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत. ‘राधे श्याम’चे फर्स्ट सिंगल ‘ई राठले’ गाणे गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाले आहे. जे चार्टबस्टर झाले आहे. दरम्यान, या गाण्याचे गीतकार कृष्णकांत यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या कथेचा खुलासा केला आहे.
‘राधे श्याम’मध्ये पुनर्जन्म आणि ट्रेनचा प्रवास येणार आहे दाखवण्यात
‘राधे श्याम’ चित्रपटाविषयी बोलताना प्रसिद्ध गीतकार कृष्णकांत म्हणाले की, चित्रपटातील सर्व ५ गाणी त्यांनी लिहिली आहेत. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या कथेचे रहस्यही सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ‘राधे श्याम’ १९७० च्या दशकातील युरोपच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. परंतु त्याबद्दल बरीच अटकळ आहे. काहींचा असा विश्वास आहे की, हा चित्रपट पडद्यावर पुनर्जन्म किंवा काळाचा प्रवास दर्शवेल. तर काहीजण म्हणतात की, ‘राधे श्याम’ हे रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या रहस्याबद्दल आहे. गीतकार पुढे म्हणाले की, “काहीही असो, हा सस्पेन्स तसाच ठेवूया.”
गीतकार कृष्णकांत यांनी या गाण्याबद्दल सांगितले की, त्यांनी लिहिलेले ‘ई राठले’ हे गाणे काही लोकांना कॉम्प्लिकेटेड वाटेल. पण ते मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर त्यांना ते नीट समजेल. ‘ई राठले’ या गाण्याच्या माध्यमातून संपूर्ण चित्रपट सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यासह यातील खूप गोंधळात टाकणारी सीन घेण्याऐवजी मॉन्टेज शॉट्स घेतले आहेत. ‘राधे श्याम’ हा एक इंडियन पिरियड साय-फाय रोमान्स ड्रामा आहे. जो ‘राधा कृष्ण’ कुमार यांनी घेतला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा