Monday, July 1, 2024

सौंदर्यवतींच्या जाळ्यात अडकलेले बॉलिवूड कलाकार, संसार तुटण्याच्या उंबरठ्यावर असताना मागितली पत्नीची माफी

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे लग्न होऊन देखील ते सुंदर अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे झाले आहेत. कित्येक काळ पत्नीला माहिती न होता रिलेशनमध्ये राहिले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज अभिनेत्यांचा देखील समावेश आहे. यानंतर जेव्हा त्यांच्या पत्नीला हे कळले, तेव्हा कलाकारांनी माफी मागितली जेणेकरून त्यांचा संसार वाचू शकेल. चला तर मग जाणून घेऊया हे कलाकार कोण आहेत.

सौंदर्यवतींच्या जाळ्यात अडकलेले बॉलिवूड कलाकार
अमिताभ बच्चन
अफेअर्सबद्दल बोलताना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे नाव आले नाही, असे कधीच होऊ शकत नाही. ते जया भादुरी यांच्याशी लग्न करणार होते. मात्र, रेखा यांच्यासोबत त्यांचे नाव चर्चेत होते. लग्न झाल्यानंतरही रेखा यांच्या नावाचा अमिताभ यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला, पण शेवटी सर्व काही सुरळीत झाले.

आदित्य पांचोली
अभिनेता आदित्य पांचोली विवाहित असूनही, अभिनेत्री कंगना रणौतच्या प्रेमात पडला होता. यामुळे आदित्य पांचोलीचे त्याची पत्नी जरीना वहाबसोबतचे संबंध बिघडले. मात्र, नंतर जरीनाने आदित्य पांचोलीला माफ केले आणि गोष्टी सामान्य केल्या.

अक्षय कुमार
या यादीत सुपरस्टार अक्षय कुमारच्या नावाचाही समावेश आहे. ट्विंकल खन्नासोबत आपले वैवाहिक जीवन व्यतीत करत असताना, त्याचे हृदय प्रियांकासाठी इतके धडधडत होते की, त्याचा आवाज ट्विंकलपर्यंत पोहोचला. त्यानंतर ट्विंकलने त्याला समजावले आणि प्रकरण रुळावर आले.

अजय देवगण
‘सिंघम’ फेम अभिनेता अजय देवगणने कंगनासोबत ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात काम केले होते. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. अशी माहिती समोर आली होती की, जेव्हा काजोलला हे समजले, तेव्हा ती अजयवर चिडली आणि त्यानंतर अजयने माफी मागितल्यानंतर सर्व गोष्टी पुन्हा रुळावर आल्या.

राज कपूर
अभिनेते राज कपूर पत्नी कृष्णासोबत हसत-खेळत आयुष्य व्यतीत करत होते की, त्याच काळात त्यांचे हृदय अभिनेत्री नर्गिसमध्ये गुंतले. याचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला, पण कृष्णाच्या समजुतीने नाते तुटले नाही.

शत्रुघ्न सिन्हा
या यादीत इंडस्ट्रीतील ‘शॉटगन’ म्हणून ओळखळे जाणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी दोघांनाही अनेकदा एकत्र पकडले, पण पूनम यांनी कधीच आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला नाही.

राज बब्बर
ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचे हृदय स्मिता पाटील यांच्यात गुंतले होते. त्याआधी त्यांनी नादिरासोबत लग्नगाठ बांधली होती. राज यांनी नादिराला स्मितासाठी सोडले होते. मात्र, प्रतीकला जन्म देत असताना प्रसूतीनंतर स्मिताचा मृत्यू झाला. यानंतर राजने पुन्हा वळून नादिराकडे पाहिले आणि नादिराने मोठे मन दाखवत एक्स पतीला आपलेसे केले.

शाहरुख खान
या यादीत ‘किंग खान’ शाहरुख खानचेही नाव आहे. लग्न केल्यानंतर शाहरुखचे मन प्रियांका चोप्रावर घसरले होते, पण नंतर शाहरुखच्या समजूतीवर गौरीने त्याला माफ केले.

गोविंदा
गोविंदाचे नाव राणी मुखर्जीसोबत बरेच दिवस जोडले गेले होते.

दोघांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर गोविंदाची बालपणीची मैत्रीण सुनीताने त्याला स्वीकारले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रह्मा मिश्रासारखीच ‘या’ कलाकारांनीही घेतली अचानक एक्झिट, एक तर दोन दिवस लटकला होता पंख्याला

-‘माचीस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जिम्मी शेरगीलने कॅरेक्टर भूमिकांमधून मिळवली तुफान प्रसिद्धी

-याहूवर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांच्या यादीत ‘हा’ अभिनेता ‘दबंग’ खानलाही देतोय टक्कर, पाहा यादी

हे देखील वाचा