‘कटी पतंग’, ‘तीसरी मंजिल’ आणि ‘आन मिलो सजना’ यांसारखे अनेक हिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे आशा पारेख होय. आशा पारेख यांनी त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. तसेच, मोठा चाहतावर्गही कमावला आहे. त्या ऐंशी वर्षांच्या वयातही सुंदर दिसतात. त्यांनी नुकतेच गोव्यात पार आयोजित केलेल्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी सिनेसृष्टी आणि समाजातील संस्कृतीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महिलांबद्दल असे काही वक्तव्य केले, ज्यावर आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकरी आशाजींच्या या वक्तव्याशी असहमत असल्याचे दिसले.
काय म्हणाल्या आशा पारेख?
अभिनेत्री आशा पारेख (Actress Asha Parekh) यांच्यानुसार, त्यांना हे पाहून दु:ख होते की, लग्नामध्ये मुली पारंपारिक ड्रेस जसे की, घागरा-चोलीसोडून पाश्चिमात्य ड्रेस आणि गाऊन परिधान करतात. त्या म्हणाल्या की, “सर्वकाही बदलले आहे. आता जे सिनेमे बनत आहेत, मला माहिती नाही. आपल्यात खूपच पाश्चिमात्यपणा आला आहे. गाऊन परिधान करून मुली लग्न समारंभात येतायेत. अरे बाबा आपली घागरा-चोली, साड्या आणि सलवार कुर्ती आहेत, तुम्ही त्या परिधान करा. तुम्ही ते परिधान का करत नाहीत?”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “त्या फक्त रुपेरी पडद्यावर अभिनेत्रींना पाहतात आणि त्यांना कॉपी करावेसे वाटते. पडद्यावर पाहून विचार करतात की, त्या जे काही कपडे परिधान करत आहेत, तसेच कपडे आम्हीही परिधान करू. जाड असो किंवा कसेही, आम्ही तेच परिधान करणार. हे सर्व पाश्चिमात्य होत आहे. मला वाईट वाटते. आपली महान संस्कृती आहे. त्यात नृत्य, संगीत आहे.”
आशा पारेख यांच्याबद्दल थोडक्यात
आशा पारेख (Asha Parekh) यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्या 60 आणि 70च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या या काळातील सर्वात मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींमध्ये केली जाते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘दादासाहेब फाळके’ या मानाच्या पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. (actress asha parekh comment on indian women who wear western dresses for weddings sparks controversy)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सिनेमात गुंडांच्या नाकी नऊ आणणाऱ्या अजय देवगणची ‘या’ गोष्टीमुळे टरकते, वाचा कोणती आहे ती गोष्ट
आयुष्मानने शाहरुखच्या बंगल्याकडे पाहून मागितली ‘मन्नत’, चाहते म्हणाले, ‘स्वत:ला कमी लेखू नको…’