ऐश्वर्या रॉय बच्चन ! विश्वसुंदरी, भारतीय सिनेअभिनेत्री! आणखीन काय विशेषणे द्यायची हिला! खरंच, ऐश्वर्यासारखी दुसरी विश्वसुंदरी नाही. बॉलिवूडची अँजेलीना जोलीच म्हणाना ना!
लॉकडाऊनच्या काळात सगळं काही ठप्प होतं. सगळेजण घरातच होते. मग अशा वेळी काय करणार, तर अनेकांना वेगवेगळ्या कल्पना सुचू लागल्या. त्यातूनच सोशल मीडियावर आपापल्या आवडत्या कलाकारांचे जुने व्हिडिओ आणि फोटो पुन्हा व्हायरल करू लागले.

याचा मनमुराद आनंद देखील घेऊ लागले. आपलं मन दुसरीकडे वळवू लागले. आता काही दिवसांपासून ऐश्वर्याचे अनेक बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात ती खूप गोड अशी लहान मूल वाटत आहे. चला तर या फोटोंबद्दल जाणून घेऊयात.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याचे अनेक बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात ती खूप गोंडस अशी लहान मुलगी दिसत आहे. अनेक जण या फोटोंवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रतिक्रियांमध्ये अमेझिंग, खूपच सुंदर, अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पण आपल्याला ठाऊक आहे का की हे फोटो खरंच ऐश्वर्याच्या लहानपणीचे नाही आहेत.

तिचे गेल्या काही वर्षातील विविध समारंभातील फोटोना बेबी फिल्टरचा वापर करून तसा इफेक्ट् देण्यात आला आहे. काहीही म्हणता कसलेही इफेक्ट्स द्या परंतु ती आहे ऐश्वर्या जिच्या सौंदर्यात काडीचाही फरक पडत नाही. याच निमित्ताने आपण या विश्वसुंदरीच्या बाबतीत आणखीन काही बाबी जाणून घेऊयात.
सन १९७३ साली मंगळुरु येथे जन्मलेल्या ऐश्वर्याने केवळ चित्रपटांतच नव्हे तर मॉडेलिंग जगतातही यश मिळवलं आहे. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज हे जीवशास्त्रज्ञ होते. तिच्या आईचं नाव वृंद्रा रॉय आणि भावाचे नाव आदित्य रॉय आहे.
ऐश्वर्याला शाळेच्या असल्यापासूनच मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि इयत्ता नववीत असताना तिला पहिली जाहिरात मिळाली. तिने एका पेन्सिलची जाहिरात केली होती. १९९१ मध्ये ऐश्वर्याने सुपरमॉडल स्पर्धा जिंकली. फोर्डने आयोजित केलेली ही स्पर्धा जिंकल्यानंतर अमेरिकेच्या व्होग मॅगझिनच्या आवृत्तीत तीला मानाचं स्थान मिळालं.
सन १९९३ मध्ये आमिर खानबरोबर ती एका अॅडमध्ये दिसली होती. १९९४ मध्ये जेव्हा ऐश्वर्याने मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकलं तेव्हा तिला कार्यक्रमाच्या होस्टने डेटसाठी विचारलं होतं. परंतु ऐश्वर्याने ही ऑफर नाकारली.
ऐश्वर्याने दाक्षिणात्य सिनेमा ‘इरुवर’ (१९९७) पासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा सिनेमा मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. तिचा पहिला बॉलीवुड सिनेमा ‘और प्यार हो गया’ (१९९९) हा होता. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केलं होतं.

परंतू, तिला खरी ओळख मिळाली ती १९९९ साली आलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमपासून! यानंतर तिने देवदास, ताल, गुरू, धूम२, रोबोट अशा अनेक सिनेमांमधून काम केलं. २००९ साली ऐश्वर्याला भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता.
गुरू सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तिची ओळख अभिषेक बच्चन याच्याशी झाली. याच चित्रपटाच्या सेटवर अभिषेक बच्चन ने तिला प्रपोज केलं आणि ऐश्वर्यानेही होकार दिला. २००७ मध्ये अगदी राजेशाही थाटात या दोघांचाही विवाह पार पडला. या दोघांनाही आता आराध्या नावाची एक गोंडस लेक असून हे दोघेही सुखाने संसार करत आहेत.