Friday, March 29, 2024

पान मसाला जाहिरातीवर अक्षय कुमारनंतर आलं अजय देवगणच वक्तव्य, म्हणाला ‘असे’ काही

हिंदी सिनेसृष्टीतील तीन बड्या सुपरस्टार्सची जाहिरात सध्या खूप चर्चेत आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan), अजय देवगण (Ajay Devgan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यावर या जाहिरातीत एकत्र आल्याबद्दल जितकी स्तुती केली जात नाही, तितकी त्यांच्यावर टीका होत आहे. यामध्ये सर्वात जास्त त्रास अक्षय कुमारला होत आहे.

ट्रोलर्स अक्षय कुमारचे जुने व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्याला आठवण करून देत आहेत की, त्याने पान मसाला कंपनीसाठी कधीही जाहिरात करणार नाही, असे सांगितले होते. यावर अक्षय कुमारने माफी मागितली असून भविष्यात अशा जाहिराती न करण्याचे वचन दिले आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर अजय देवगणने आपले मत मांडले आहे. (ajay devgn reaction on akshay kumar pan masala ad goes viral on social media)

अजयने एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “कशाचीही जाहिरात करणे ही कोणाचीही वैयक्तिक बाब आहे. आपले निर्णय स्वतः घेण्याइतके आपण प्रौढ आहोत.” तो म्हणाला, की काही उत्पादने हानिकारक आहेत आणि काही अशी आहेत जी हानी करत नाहीत. मी इलायचीची जाहिरात करत आहे.” अजयच्या म्हणण्यानुसार, ज्या वस्तूंचे नुकसान होणार आहे, त्या विकल्याच गेल्या नाही पाहिजेत.

पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमारला गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रोल केले जात होते. यानंतर अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक नोट शेअर करून त्या जाहिरातीबद्दल माफी मागितली. यासोबतच भविष्यात अशा जाहिराती टाळण्याबाबतही त्याने वचन दिले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अक्षय कुमार नुकताच ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. दुसरीकडे, अजय देवगण लवकरच ‘रनवे३४’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २९ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा