Friday, March 29, 2024

जवळपास २७ वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळ्या राहतात अलका याज्ञीक, भांडण नाही तर ‘हे’ आहे दूर राहण्याचे कारण

आपण मधल्या काही काळापासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप हा शब्द ऐकत आहोत. मात्र बॉलिवूडमध्ये अशी एक जोडी आहे, जी मागील तब्बल २७ वर्षांपासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहे. दूर राहूनही एकमेकांवरील प्रेम, आदर, काळजी यत्किंचितही कमी झालेला नाही. आज आपण अशीच एक लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल जाणून घेऊया. बॉलिवूडमध्ये काही लोकं गायक, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक म्हणूनही येत असतात. अशीच एक मुलगी ७० च्या दशकात आपल्या आईसोबत केवळ वयाच्या सहाव्या वर्षी गायिका होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली आणि मुंबईचीच होऊन गेली. आम्ही बोलत आहोत अतिशय यशस्वी, सुरेल आणि मधुर आवाजाच्या गायिका अलका याज्ञीक यांच्याबद्दल. अलका यांनी वयाच्या सहाव्या वर्षीच बॉलिवूडमध्ये डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली आणि पुढे त्या आघाडीच्या गायिका म्हणून समोर आल्या. आज (२० मार्च) अलका त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही.

अलका याज्ञीक यांचे यशस्वी प्रोफेशनल आयुष्य सर्वांनाच माहित आहे. मात्र अलका याज्ञीक यांच्या वैयक्तिक आणि खासकरून त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खूपच कमी लोकांना माहित असेल. अलका यांनी १९८९ मध्ये शिलॉंगमधील यशस्वी व्यावसायिक असणाऱ्या नीरज कपूर यांच्याशी लग्न केले. विवाहित असूनही अलका या मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या पतीपासून वेगळ्या मुंबईत राहत आहे. मात्र त्यांच्या वेगळे राहण्याचे कारण तुम्हाला जे वाटत आहे ते नसून वेगळेच आहे. हो, अलका या त्यांच्या पतीपासून कोणत्याही भांडणामुळे नाही तर कामामुळे वेगळ्या राहत आहे.

 

अलका याज्ञीक आणि त्यांचे पती असलेल्या नीरज यांनी प्रेमविवाह केला आहे. या दोघांची प्रेमकहाणी खूपच हटके आहे. अलका आणि नीरज यांची पहिली भेट एका रेल्वे स्टेशनवर झाली. त्यानंतर प्रवासादरम्यान त्यांच्यात चांगलीच ओळख, मैत्री निर्माण झाली. पुढे हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. तेव्हा नीरज यांनी शिलाँगमध्ये त्यांचा व्यवसाय सुरु केला होता आणि यशही मिळवले होते. या प्रेमाला त्यांना लग्नात बदलवायचे होते तेव्हा अलका यांनी त्यांच्या घरी नीरज यांच्याबद्दल आणि त्यांच्याशी लग्न करण्याबद्दल सांगितले. नीरज आणि अलका यांच्या लग्नाला घरातून कोणताच विरोध झाला नाही, मात्र सर्वांना एकच चिंता होती, या दोघांच्या कामाची आणि वेगवेगळ्या शहरात राहण्याची.

कारण नीरज आणि अलका या दोघांचेही काम वेगळे होते आणि दोन वेगवेगळ्या शहरात होते. अशा परिस्थितीत त्यांच्या नात्यात पुढे जाऊन नक्कीच समस्या निर्माण होणार याची भीती घरच्या लोकांना होती. मात्र दोघांनीही त्यांच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले. लग्नानंतर अलका या त्यांच्या करिअरसाठी मुंबईत तर नीरज शिलॉंगमध्ये राहतात. दोघे नेहमीच वेळ काढून एकमेकांना भेटतात आणि एकत्र वेळ घालवतात. एकमेकांपासून लांब राहूनही दोघांमध्ये खूपच प्रेम आहे. या दोघांना एक मुलगी असून, तिचे लग्न झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा