Tuesday, June 24, 2025
Home मराठी ‘बदल खूप जवळून पाहिलाय मी’, म्हणत रुचिरा जाधवने शेअर केलेली पोस्ट झाली व्हायरल

‘बदल खूप जवळून पाहिलाय मी’, म्हणत रुचिरा जाधवने शेअर केलेली पोस्ट झाली व्हायरल

नुकताच मराठी बिग बॉस शोचा ग्रँड फिनाले संपन्न झाला. जवळपास ९० दिवसांनंतर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाच्या विजेत्यांचे नाव जाहीर करण्यात आले. या पर्वामध्ये अनेक नामी चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. विविध कारणांमुळे हे पर्व देखील तुफान गाजले. ‘अक्षय केळकर’ने विजेता ठरत बॉग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सोहळ्यात या पर्वातील घरातून बाहेर पडलेले स्पर्धक आणि इतर पर्वातील स्पर्धक देखील पाहायला मिळाले. मात्र या सर्वांमध्ये याच पर्वातील चर्चित स्पर्धक असलेली रुचिरा जाधव दिसली नाही. तिच्या नसण्यामुळे अनेक चर्चाना उधाण आले, आणि त्यातच रुचिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने तिच्या डायरीत तिने बिग बॉसबद्दल लिहिलेल्या काही पानांचा फोटो आहे. तिने तिच्या डायरीच्या सहा पानांचा फोटो शेअर केला असून, यात तिने अनेक गोष्टी सांगितल्या. 

 

View this post on Instagram

 

A post shared by RucHira Jadhav – Rooh (@ruchira_rj)

रुचिराने बिग बॉसच्या अंतिम भागाच्या दिवशी ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ” प्रत्येक क्षणी जेव्हा मला जाणवले की, हा शेवट असेल, #ruchirasay मी ठरवले की “हा इंटरव्हल पॉइंट आहे” ! प्रेम, विश्वास आणि शांती. आयुष्य खूप अनमोल आहे… तुम्हीही आहात!!” या पोस्टमध्ये तिने अनेक गोष्टींचे खुलासे करत म्हटले आहे की. “आज मी तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहे.” तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ती या इंडस्ट्रीमध्ये नव्हती तेव्हा हा शो पाहायची. हा शो ती;या आवडायचा. कारण यात तुम्ही जसे खऱ्या आयुष्यात आहेत तसेच दिसता. या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर २०२१ साली तिला या शोसाठी विचारणा झाली, मात्र तिच्या बहिणीच्या लग्नामुळे तिला नकार द्यावा लागला. पुन्हा २०२२ ला तिला एका नवीन आणि हटक्या ट्विस्टसोबत शोसाठी विचारले गेले. वैयक्तिक आयुष्य असे जगासमोर आणण्यासाठी मोठ्या हिमतीने तिने स्वतःला तयार केले. मात्र तिने ठरवलेल्या गोष्टी घडल्या नाहीत. ही संधी तिच्यासाठी मोठी होती मात्र तिला तिच्या मनासारखे खेळता आले नाही, वागत आले नाही आणि जगता आले नाही.

हे सर्व लिहिताना रुचिरा खूप जास्त भावनिक झाल्याचे देखील पोस्ट वाचताना समजते. रुचिराने मोठ्या मेहनतीने, कष्टाने आणि स्वबळावर तिचे या क्षेत्रात स्थान निर्माण केले किंबहुना ते ती अजूनही करत आहे. तिने खूप काही लिहिले आहे, शेवट ती म्हणते, “जो तुमच्या स्वप्नांना किंमत देत नाही त्याच्यासाठी तुमचे आयुष्य वाया घालवू नका, स्वप्न तुटण्यापेक्षा पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवा आई तुम्ही तुमची स्वप्न जागा.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न

‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल

हे देखील वाचा