Saturday, June 29, 2024

‘मिस्टर इंडिया 2’वर बोनी कपूर यांचा शिक्कामोर्तब! चित्रपटाबाबत सगळ्यात मोठे अपडेट समोर

बोनी कपूर (Bonny Kapoor) यांनी वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांच्या नवीन स्टारकास्टसह ‘नो एन्ट्री’ फ्रँचायझीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनीस बज्मी ‘नो एंट्री 2’ साठी दिग्दर्शक म्हणून काम करणार आहेत आणि 2024 च्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर जाईल. आता बोनी कपूर यांनी त्यांच्या ‘मिस्टर इंडिया’ या कल्ट चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडला आहे.

बोनी कपूर पुढे म्हणाले, “माझ्या बहुतेक क्रू सदस्यांना वाटते की आपण मिस्टर इंडिया 2 चा प्रयत्न करू नये कारण श्रीदेवी आणि अमरीश पुरी आता या जगात नाहीत. यासोबतच सतीश कौशिक यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, माझ्या मनात कुठेतरी मिस्टर इंडिया २ होणार आहे.”

चित्रपट निर्मात्याने शेअर केले, ‘आम्ही नो एंट्री 2 या वर्षाच्या अखेरीस, डिसेंबरमध्ये कधीतरी सुरू करू. यात वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांच्या भूमिका आहेत. आम्ही अजून अभिनेत्रींना कास्ट करायचे आहे, पण मैदान रिलीज होताच आम्ही अभिनेत्रींना कास्ट करण्याच्या दिशेने वाटचाल करू. या चित्रपटात 10 अभिनेत्री असणार आहेत. नो एंट्रीच्या सिक्वेलमध्ये वरुण, अर्जुन आणि दिलजीत दुहेरी भूमिका साकारणार आहेत, ज्यामुळे गोंधळ दुहेरी होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

वडिलांची कष्टाची प्रॉपर्टी विकून बनवला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट, रणदीप हुड्डाने केला मोठा खुलासा
आदित्य-अनन्याची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार एकत्र, दोघांना पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा