बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या ‘थलायवी’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाने या चित्रपटात जयललिताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडला. यापूर्वी हा चित्रपट यापूर्वी २३ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. आता हा चित्रपट १० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
#OneWordReview…#THALAIVII: POWERFUL.
Rating: ⭐⭐⭐⭐️
One of the most powerful biopics to release on the #Hindi screen… Loads of drama + strong emotions + bravura performances [#KanganaRanaut and #ArvindSwami pitch in award-worthy acts] are major aces. #ThalaiviiReview pic.twitter.com/9RQKOT8hXt— taran adarsh (@taran_adarsh) September 7, 2021
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी कंगनाचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पहिला असून, चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ट्वीट करत कंगनाची आणि सिनेमाची स्तुती करताना ‘शानदार’ म्हणत ‘थलायवी’ सिनेमाला चार स्टार दिले आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे वर्णन शक्तिशाली चित्रपट म्हणून केले आहे. सर्वच गोष्टी सर्वोत्तम पद्धतीने जुळून आल्याने ‘थलायवी’सारखी उत्कृष्ट कलाकृती सर्वांसमोर येत आहे.
#Hindi movies seldom offer opportunities to actors to depict iconic/memorable characters and #Kangana gets that chance of portraying the most demanding role of her career in #Thalaivii. Her career-best act. Sure to win accolades and awards. #ThalaiviiReview
— taran adarsh (@taran_adarsh) September 7, 2021
तरण आदर्श यांनी ट्वीट करत लिहिले की, “हिंदीमध्येे प्रदर्शित होणाऱ्या सर्वात उत्तम आणि दर्जेदार बायोपिक्सपैकी एक … चित्रपटात खूप ड्रामा आहे. तसेच हा सिनेमा खूप भावनाप्रधान आहे. यासोबतच कंगनाचा अभिनय देखील उत्कृष्ट आहे. कंगना आणि अरविंद स्वामी यांनी प्रशंसनीय काम केले आहे.”
Any amount of praise will not do sufficient justice to the character portrayed by #ArvindSwami in #Thalaivii. He is fantastic… Yet another talent that stands out is #RajArjun. He is in terrific form… #Nasser shines in every sequence he appears in. #ThalaiviiReview
— taran adarsh (@taran_adarsh) September 7, 2021
Writers #VijayendraPrasad [#BajrangiBhaijaan, #Baahubali] and #RajatArora encompass pertinent episodes from #Jayalalithaa’s life and weave a captivating, sharp screenplay that highlights her struggles, obstacles, apprehensions and eventual triumph. #Thalaivii #ThalaiviiReview
— taran adarsh (@taran_adarsh) September 7, 2021
चित्रपट पाहिलेले प्रसिद्ध समीक्षण असणाऱ्या तरण आदर्श यांच्या मते, कंगनाच्या कारकिर्दीतील हा आजवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असणार आहे. याशिवाय या चित्रपटाला निःसंशयपणे यावर्षी भरपूर पुरस्कार देखील मिळणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
याशिवाय तरण आदर्श यांनी लेखक विजयेंद्र प्रसाद आणि रजत अरोरा यांचे जयललिता यांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, अडथळे, त्यांचे विजय हे सर्व अतिशय प्रभावी पद्धतीने लिहिले आहे. सोबतच त्यांनी या सिनेमाची दिग्दर्शक असणाऱ्या ए.एल. विजय यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक करत, चित्रपटाच्या सेकंड हाफला अधिक चांगले म्हटले आहे. तरण आदर्श सांगतात की, हा चित्रपट कलेच्या बाबतीत प्रत्येक पैलूला न्याय देतो.
#Vijay’s direction is top notch. He balances the love story [first half] and dramatic moments [second half] seamlessly. Also captures the bygone era with precision and delivers a film that has soul, scale and style. #ThalaiviiReview
— taran adarsh (@taran_adarsh) September 7, 2021
‘थलायवी’ १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आणि चाहते बऱ्याच काळापासून कंगनाच्या या चित्रपटाची वाट पाहत होते. हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन
-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी
-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे