Wednesday, July 3, 2024

तिच्यासाठी काय पण? ‘ड्रिमगर्ल’ हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र यांनी अक्षरशः आकाश पाताळ एक केले होते

बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल आतापर्यंत बरंच काही लिहिलं गेलं आहे. छोट्या गावातून बॉलिवूडपर्यंतचा त्यांचा संघर्ष खरोखरच स्तुत्य आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ज्या प्रकारे आपला ठसा उमटवला तो पुढील अनेक वर्षे लक्षात राहील. धर्मेंद्र यांच्या आयुष्यात यश आणि वाद कायम राहिले. दोन विवाह करणार्‍या धर्मेंद्र यांनी जितेंद्रना अलगद बाजूला सारून हेमा मालिनीबरोबर सात फेरे घेतले. आज आपल्याला आम्ही हा किस्सा सांगणार आहोत.

धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना शहरातील नसराली या लहानशा गावात झाला. जाट कुटुंबात जन्मलेले धर्मेंद्र लहानपणापासूनच निरोगी होते. जेव्हा ते 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी प्रकाश कौरशी यांच्याशी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्रने बॉलिवूडमध्ये पाऊल देखील ठेवले नव्हते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या. बॉलिवूडमध्ये प्रवेश होताच ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले.

धर्मेंद्र व्यतिरिक्त हेमा मालिनी यांच्यावर जितेंद्र आणि संजीव कुमारदेखील प्रेम करत होते आणि त्यांच्याशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, अशी बातमीही मिळाली होती की जितेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते चेन्नईमध्ये आहेत. तथापि, त्यावेळी जीतेंद्र त्यांच्या विद्यमान पत्नी शोभा कपूर यांच्यासोबत नात्यात होते.

धर्मेंद्र यांना जेव्हा हेमा मालिनी आणि जीतेंद्रच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ते खूप संतापले. हे लग्न थांबवण्यासाठी त्यांनी एक कल्पना आखली. धर्मेंद्र जितेंद्र यांच्या पत्नी शोभा यांना घेऊन मद्रासला आत्ताचे चेन्नई येथे पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर शोभा यांनी कथितरीत्या खळबळ उडवून दिली. यामुळे जितेंद्र आणि हेमा यांचे लग्न काही होऊ शकले नाही.

नंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना वेळ पाहून प्रपोज केले. लग्न करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धर्मेंद्र हे आधीच विवाहित होते आणि हिंदू म्हणून पुन्हा लग्न करू शकत नव्हते. यामुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर हेमा मालिनी यांच्याशी पुन्हा लग्न केलं.

हे देखील वाचा