Friday, July 5, 2024

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक? वाचा काय म्हणाल्या सायरा बानू

दिलीप कुमार आणि सायरा बानू  हे बॉलीवूडमधील एक जेष्ठ आणि आदर्श जोडपं आहे. १९६६ साली या दोघांनी लग्न केले. आज लग्नाच्या ५४ वर्षांनंतरही ते एकमेकांसोबत आनंदाने जीवन व्यतीत करत आहे. सायरा नेहमीच दिलीप कुमार यांची खूप काळजी घेत असतात. सतत त्याच्या सोबत त्या असतात.

नुकतेच सायरा बानू यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितले की, “दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या ठीक नसून ते खूप अशक्त झालेआहेत, त्यांची प्रतिकार शक्ती देखील कमी झाली आहे. सायरा यांनी फॅन्स ला विनंती करत सांगितले की तुम्ही दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा.”

सायरा यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितले की, ” ते खूप अशक्त झाले आहे. कधी कधी ते हॉल पर्यंत येतात आणि पुन्हा त्यांच्या खोलीत जातात. त्यांना खूप अशक्त वाटत आहे शिवाय त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. तुम्ही सर्वानी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही रोजच्या दिवसासाठी देवाचे आभार मानत आहोत.” त्या पुढे म्हणतात, “मी दिलीप कुमार यांची काळजी कोणाच्या दबावामध्ये नाही घेत, उलट मला त्यांची काळजी घ्यायला त्यांच्या सोबत राहायला खूप आवडते. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मला नाही वाटत की लोकांनी माझी स्तुती करावी. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य समजते.”

११ ऑक्टोबर रोजी सायरा आणि दिलीप कुमार यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. मात्र यावर्षी दिलीप कुमार यांच्या भावांचे एहसान आणि असलम यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांनी यावर्षी लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही.

हे देखील वाचा