महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. जालना येथे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने त्यांना भेटून चर्चा केली. या बैठकीत सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, जरांगे पाटील यांना या आश्वासनावर समाधान न झाल्याने त्यांनी उपोषण सुरू ठेवले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा महाराष्ट्रातील राजकीय पटलावर अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. 2018 मध्ये तत्कालीन सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिले होते. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग अजूनही मोकळा झालेला नाही. आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेले आहे. या आंदोलनाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. या दरम्यान साताऱ्यातील साखळी उपोषणात अभिनेते किरण माने (Kiran Mane) देखील आंदोलनकर्त्यांबरोबर बसले. त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक पोस्ट शेअर शेअर केली आहे.
पोस्ट करताना किरण माने यांनी लिहिले की, “सातार्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून. सगळ्या पाहुणेमंडळींबरोबर थोडा वेळ बसलो. त्यात कोडोलीतले 75 वर्षांचे तात्या सावंत दोन दिवस झाले उपोषणाला बसलेत. त्यांना ‘तब्येतीची काळजी घ्या’ अशी विनवणी केली पण ऐकायला तयार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ‘करो या मरो’ या स्टेजवर आलाय. लढा द्यायलाच हवा, पण असे वयोवृद्ध लोक मैदानात उतरल्यामुळं त्यांच्या प्रकृतीची लै काळजी वाटायला लागलीय. आज एका तरण्याबांड भावानं आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी एकानं स्वत:ला संपवलं होतं. एकानं गाड्या फोडल्या… इतकं इमोशनल होऊन कसं चालंल माझ्या भावांनो!
…आपली ताकद मोठी हाय. शांततेत काम केलं तरी पुरेसं हाय. वाघाच्या अस्तित्वात आणि डरकाळीत दहशत असते. समोरचा कितीही माजलेला असला तरी एका डरकाळीत जागेवर थरथरला पायजे. कशाला उतावीळ होऊन टोकाचे निर्णय घ्यायचे? जरांगे पाटलांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम. यश मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाय आपला मराठा गडी, असा आत्तातरी पूर्ण विश्वास वाटतोय! फक्त अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही गोष्टींची काळजीही वाटते आहे. असो. आपण सध्या तरी फक्त ‘पाझिटिव्ह’ विचार करूया. जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं हाय.
माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत हाय! योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपणा करायच्या आधी कुटुंबाचा विचार करा. आपण आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार… आपण मिळवणारच…कुणाचा बाप ते थांबवू शकत नाय!” त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट आल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “आत्महत्या करून कोणताहि लढा देता येत नाही, त्यासाठी जगावं लागतं” दुसऱ्याने लिहिले की, “आंदोलनाला नक्की यश मिळेल. पण गांधी,लोहिया,जय प्रकाश बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक मार्गानेच जावे लागेल.राजकारणी व सत्ताधारी चकवा देण्यात माहीर असतात. हे विसरून चालणार नाही.” (Famous actor Kiran Mane post about Maratha reservation goes viral)
आधिक वाचा-
–ऐश्वर्यासोबत इंटिमेट सीन करताना थरथर कापत होता रणबीर कपूर; पुढे…
–‘आंटीला काम मिळेना…’ नेटकऱ्याच्या टीकेवर अमृताने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली, ‘अहो आजोबा…’