Wednesday, July 3, 2024

अभिनयात करिअर करायचे नसूनही केवळ गुरुजींच्या सांगण्यावरून बनला अभिनेता, जाणून घ्या इमरान हाश्मीचे काही किस्से

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने त्याच्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर आज हे स्थान मिळवले आहे. २००३ पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या इमरानला परिचयाची गरज नाही, त्याने आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. इमरानने २००३ मध्ये ‘फूटपाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता तो लवकरच अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘सेल्फी’ या चित्रपटात दिसणार आहे. तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इमरान हाश्मी गुरुवारी (२४ मार्च) त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो इंडस्ट्रीमध्ये सीरियल किसर म्हणून ओळखला जातो. चला तर मग त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने इमरानच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

अभिनेता नव्हते व्हायचे 

पडद्यावर आपली प्रत्येक भूमिका परिपूर्णतेने साकारणाऱ्या इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) आपल्या रोमँटिक प्रतिमेवर मात करण्यासाठी अनेक ऍक्शन चित्रपटही केले. त्याने या भूमिकाही खूप चांगल्या प्रकारे साकारल्या. पण तुम्हाला माहित आहे का की, या दमदार अभिनेत्याला अभिनयाच्या या रंगीबेरंगी दुनियेत पाऊल ठेवायचे नव्हते. तो या क्षेत्रात योगायोगाने आला होता.

इम्रानला कॅमेऱ्याची वाटत होती भीती

हजारो वेळा कॅमेऱ्यासमोर आलेला इमरान हाश्मी एकेकाळी कॅमेऱ्याला खूप घाबरायचा. एका संभाषणादरम्यान इम्रानने सांगितले होते की, “मला कॅमेऱ्याचा सामना करायला खूप भीती वाटत होती.” भीती असूनही इमरानने बालकलाकार म्हणून अनेक जाहिरातींमध्ये काम केले, असले तरी लोक त्याला जज करतील याची भीती त्याला होती. या भीतीपोटी अभिनयविश्व आपल्यासाठी बनवले की काय, असा विचार त्याला करायला भाग पडले.

पंडितजींनी भीतीपासून मुक्त होण्याचा सांगितलेला मार्ग 

फार कमी लोकांना माहित असेल की, इमरानने त्याच्या पहिल्या चित्रपटात त्याचे नाव बदलले होते. कारण त्याला भीती होती की लोक त्याच्या चित्रपटांद्वारे त्याला जज करतील. या भीतीमुळे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी एका पंडिताकडे गेला होता. पंडित इमरानला त्याचे नाव बदलण्यास सुचवतो आणि सर्व काही ठीक होईल असे सांगतो.

इमरानला पहिल्या चित्रपटातून काढून आले होते टाकण्यात 

इमरानने २००३ मध्ये ‘फूटपाथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्याच्या चाहत्यांना हे माहित नसेल की, तो २००१ मध्ये ‘ये जिंदगी का सफर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणार होता. परंतु निर्मात्यांनी त्याला चित्रपटातून बाहेर काढले. दोन वर्षांनंतर त्याला मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू पसरवण्याची संधी मिळाली. पण त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळू शकले नाही आणि त्याचा पहिला चित्रपट ‘फुटपाथ’ फ्लॉप ठरला. यामुळेच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग बदलले होते.

इथूनच हिट चित्रपटांचा प्रवास झाला सुरू

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर इमरान हाश्मीला लॉटरी लागली. यानंतर त्याने ‘मर्डर’, ‘जेहर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘गँगस्टर’ आणि ‘आवारापन’ सारखे हिट सिनेमे दिले. २०१० पर्यंत, इमरानने प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवली होती. जो त्याच्या हिट गाण्यांसाठी देखील ओळखला जातो. त्याची ही रोमँटिक गाणी सगळ्यांच्याच ओठावर राहिली आणि त्यामुळे त्यांच्या फॅन फॉलोविंगमध्ये मोठी वाढ झाली.

इमरान बनला सीरियल किसर

इमरान हाश्मीला २०१० पर्यंत रोमँटिक हिरोची प्रतिमा मिळाली होती. पण २०१२ मध्ये अभिनेत्री ईशा गुप्तासोबतच्या ‘राज ३’ या चित्रपटाने त्याला वेगळा टॅग मिळवून दिला. या चित्रपटात त्याने सर्वात लांब किसिंग सीन दिले, ज्यामुळे तो बॉलिवूडमध्ये ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण’मध्ये इमरानला त्याच्या चांगल्या आणि वाईट किस्सबद्दल विचारण्यात आले होते. यावर इमरानने ‘मर्डर २’ चित्रपटात जॅकलिन फर्नांडिससोबत केलेली सर्वोत्कृष्ट किस, त्यानंतर ‘मर्डर’मध्ये मल्लिका शेरावतसोबत केलेले सर्वात वाईट किसचे वर्णन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा