Tuesday, July 9, 2024

‘दीपिका आणि रणबीर अभिनयावर प्रेम करतात’, इम्तियाज अलीने केले वक्तव्य

इम्तियाज अली सध्या आपल्या ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रासोबत काम केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक त्याच्या ‘तमाशा’ या चित्रपटाविषयी मोकळेपणाने बोलताना दिसला. यासोबतच त्याने रणबीर आणि दीपिकासोबतचे कामाचे अनुभवही प्रेक्षकांसोबत शेअर केले.

इम्तियाज अलीचा ‘तमाशा’ हा त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांनी एकत्र काम केले होते. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान इम्तियाजने सांगितले की, ‘आम्ही ‘तमाशा’च्या शेवटच्या सीनचे शूटिंग करत होतो. ज्यासाठी आम्ही एक सेट तयार केला होता जिथे रणबीर आणि दीपिका एकमेकांना नीट पाहू शकत नव्हते, परंतु त्या दृश्यातही त्यांनी अप्रतिम काम केले आहे.

इम्तियाज पुढे सांगतात, ‘आम्ही जो सीन शूट करत होतो तो खूपच इमोशनल सीन होता. ‘वेद’ आणि ‘तारा’ चित्रपटातील दोन्ही पात्र एकमेकांकडे पाहत होते. ‘वेद’ ज्या प्रकारे ‘तारा’कडे रेंगाळला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले ते पाहून लोकांना वाटले की दीपिका आणि रणबीरमध्ये खरोखर काहीतरी सुरू आहे. मला माहित आहे की त्यांच्यात असे काहीही नव्हते. त्या सीनमध्ये प्रेक्षकांना जे दिसले ते या दोघांची त्यांच्या कामाची आवड होती.

इम्तियाज अली अनेकदा बॉलिवूडमध्ये मानवी नातेसंबंधांवर चित्रपट बनवतात. प्रत्येक कथा तो वेगळ्या शैलीत दाखवतो. ‘तमाशा’ हा इम्तियाज अलीसाठी खूप खास चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा ‘वेद आणि तारा’भोवती फिरते. जे सुट्टीत एकमेकांना भेटतात आणि प्रेमात पडतात. इम्तियाज अलीने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, ‘तमाशा’ त्याच्या हृदयाच्या खूप जवळ आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ कारणामुळे अनुष्का शर्माने रणवीर सिंगला डेट केले नाही; म्हणाली, ‘मला तो आवडतो पण…’
‘फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझे हक्क मिळाले नाहीत’, इलियाना डिक्रूझने व्यक्त केले दुःख

हे देखील वाचा