Saturday, July 27, 2024

सतत होणाऱ्या टीकेमुळे जया यांनी लिहिणे केले बंद; म्हणाल्या, ‘मला माझ्या क्षमतेवर शंका येऊ लागली’

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा सध्या ‘व्हॉट द हेल नव्या’च्या नवीन सीझनसाठी चर्चेत आहे. या शोमध्ये ती तिची आजी जया बच्चन आणि तिची आई श्वेता बच्चन यांच्यासोबत मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. ‘व्हॉट द हेल नव्या’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये जया बच्चन आपल्या अपयश आणि टीकेबद्दल बोलताना दिसल्या.

अभिनेत्री जया बच्चन यांची बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख आहे. ‘गुड्डी’ या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. अलीकडेच, ती तिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ शोमध्ये नात नव्यासोबत तिच्या जुन्या दिवसांची आठवण करताना दिसली. यावर त्या म्हणाल्या, “एखाद्या कलाकाराच्या कामाचं कौतुक होत नाही तेव्हा खूप वाईट वाटतं. यश-अपयश याने फारसा फरक पडत नाही, पण चांगले काम करूनही टीका झाली तर वाईट वाटते.”

जेव्हा नव्याने जया बच्चन यांना विचारले की ती अपयशांना कशी सामोरे जाते. या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेत्री म्हणते, “अपयशाचा माझ्यावर परिणाम होत नाही, असे मी म्हणणार नाही. खरे सांगायचे तर मला अपयशापेक्षा टीकेचा जास्त फटका बसतो, पण कधी कधी माझ्या नशिबात हे लिहिलेले असावे, असे मला वाटते त्यामुळेच असे घडले. असा विचार करून मी पुढे सरकते.”

‘व्हॉट द हेल नव्या’च्या आगामी एपिसोडमध्ये जया बच्चन आणि श्वेता बच्चन अपयशांबद्दल बोलताना दिसणार आहेत. शो दरम्यान जया म्हणते, ‘मी माझे पहिले पुस्तक ‘पॅराडाईज टॉवर्स’ खूप मेहनत घेऊन लिहिले. कदाचित लोकांना ते पुस्तक लांबलचक वाटलं असेल किंवा आवडलं नसेल, पण मला त्या पुस्तकासाठी इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या की मी लिहिणं थांबवलं. कदाचित मला लिहिता येत नसेल अशी शंका मनात येऊ लागली.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कोकिलाबेन रुग्णालयात अमिताभ बच्चन यांच्यावर करण्यात आली अँजिओप्लास्टी, पण का?
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची केस पुन्हा उघडणार! बहीण श्वेताने पंतप्रधानांना केले मोठे आवाहन

हे देखील वाचा