बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ७० आणि ८०च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम केलेल्या मुश्ताक मर्चंट (Mushtaq Merchant) यांचे सोमवारी निधन झाले. सकाळी ११ वाजता मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या वेळी ते ६७ वर्षांचे होते. एका वृत्तसंस्थेला माहिती देताना, मुश्ताक मर्चंटचे अत्यंत जवळचे मित्र हनिफ जवेरी म्हणाले, “मुश्ताकच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा गंभीर प्रकार. तो गेल्या १०-१२ वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त होता. हालत बिघडल्यामुळे, त्याला सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.”
अभिनेता म्हणून उल्लेखनीय, ‘जवानी दीवानी’ हा मुश्ताक मर्चंट यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘हाथ की सफाई’, ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘सागर’, ‘दामाद’, ‘खून भरी मांग’, ‘गंगा जमुना सरस्वती’ यांसारख्या १५० हून अधिक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम केले. काही चित्रपट लिहिण्याबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहिली आहेत. (Mushtaq Merchant passed away)
हनीफ जवेरी सांगतात, “सुमारे १६-१७ वर्षांपूर्वी अभिनयाच्या जगातून त्याचा भ्रमनिरास झाला होता आणि अजमेरच्या सुफी दर्ग्याकडे त्याचा कल खूप वाढला होता. अशा परिस्थितीत त्याने स्वत:ला महजीबीच्या कामात पूर्णपणे गुंतवून घेतले. अशा परिस्थितीत ते अजमेर ते मुंबई असा प्रवास करत असत.”
मुश्ताक त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले सोडून गेले आहेत. मुश्ताक यांचा भाऊ इश्तियाक मर्चंट यांनी माध्यमांना सांगितले की, सोमवारी रात्री ९ वाजता त्यांना मुंबईतील मरीन लाइन्स येथील स्मशानभूमीत नेण्यात आले.
हेही वाचा :
अपयश पचनी पडत नसल्याने राजेश खन्ना यांनी एकदा दारूच्या नशेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न
‘शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले’, प्रकाश मेहरांनी दिला राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा